बिहार विधानसभेच सुशांतसिंह प्रकरणाचा आवाज
बिहारमधील पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटीन केल्यानंतर या प्रकरणी राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुंबईत विनय तिवारी यांच्यासोबत जे काही झाले, ते चांगले झालेले नाही, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडत असल्याचेही ते म्हणाले. आम्ही या प्रकरणी महाराष्ट्र सरकारशी देखील बोलणार आहोत, असेही नीतीश कुमार म्हणाले.
वाचा:
या नंतर या प्रकरणाचे पडसाद बिहार विधानसभेत उमटले. येथे या प्रकरणाची सीबीआय चौकशी होऊ लागली आहे. विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव यांनी देखील या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
वाचा:
महाराष्ट्र सरकारचा दृष्टीकोन देशाच्या संघराज्यीय संरचनेच्या विरोधात
मुंबईत बिहार पोलिसांनी सुरू केलेल्या तपासामध्ये मुंबई पोलिसांचे सहकार्य न मिळण्याबाबत बिहार सरकारचे मंत्री जय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र सरकारचा दृष्टीकोन हा देशाच्या संघराज्यीय संसरचनेच्या विरुद्ध आहे, असे ते म्हणाले. या पूर्वी बिहारचे मंत्री संजय झा यांनी देखील हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. विनय तिवारी यांना मुंबईत क्वारंटीन करणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. या बरोबरच या मुळे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी लोकांच्या मनात असलेला संशय यामुळे अधिक बळकट होईल, असेही ते पुढे म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Thank you for publishing this awesome article.