पुणे : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभरात १७ लाखांहून अधिक शासकीय निमशासकीय कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत. अजूनही संपकरी आणि सरकारमध्ये सकारत्मक बोलणं न झाल्याने जनतेची अनेक सरकारी कामं खोळंबली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांच्या या संपाबाबत सामान्य नागरिकांमध्ये रोष असलेल्या दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे. त्यात संप सुरु असल्याने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे शेतकरी अधिकच या संपकाऱ्यांवर नाराज असल्याचं दिसत आहे.

त्यातूनच आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रौंधळवाडी ग्रामपंचायतीने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ‘राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे भरपूर लाड पुरवले, सरकार तुम्ही जरा थांबा, ज्या काही पेन्शन योजना चालू करायच्या आहे त्या माझ्या शेतकरी वर्गासाठी चालू करा.’ अशी मागणी केली आहे.

Video: पाकिस्तानच्या क्रिकेटपटूकडून तिरंग्याचा अपमान; होऊ शकते ३ वर्षाचा तुरुंगवास आणि दंड
रौंधळवाडीचे सरपंच नाना रौंधळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत शासकीय कर्मचाऱ्यांचे लाड थांबत आता शेतकऱ्यांनाच पेन्शन सुरु करण्याची मागणी केली आहे. रौंधळवाडी ग्रामपंचायतीच्या या पत्राची सध्या जिल्ह्याभर जोरदार चर्चा सुरु आहे.

काय आहे रौंधळवाडी ग्रामपंचायतीचे पत्र?

”राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे भरपूर लाड पुरवले, सरकार तुम्ही जरा थांबा. राज्यातील शासकीय कर्मचारी वर्गाने जुनी पेन्शन योजना लागू करणे व मागण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना काम कमी आणि गडगंज पगार आणि त्यातूनही कामात करत असलेले दिरंगाई व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर होत असलेला भ्रष्टाचार या सर्वांचा विचार करता यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे योग्य नाही. जुनी पेन्शन योजना लागू करणे म्हणजे सरळ सरळ सर्व सामान्य जनतेवर व शेतकरी वर्गावर आर्थिक भार. राज्य सरकार घरातून पैसे आणत नाही हा पैसा सर्व सामान्य जनतेचा व शेतकरी वर्गाचा आहे.

त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की, आपण जुनी पेन्शन योजना चालू करू नये. ज्या काही पेन्शन योजना चालू करायच्या आहे त्या माझ्या शेतकरी वर्गासाठी चालू करा ही नम्र विनंती”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here