उल्हासनगरः मुंबई- ठाणे या मेट्रो शहरात मेट्रोचं जाळ पसरत असताना आता उल्हासनगर शहरातही आता मेट्रो सेवा सुरु होणार आहे. एमएमआरडीएने मेट्रो ५चा विस्तार आता उल्हासनगपर्यंत करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली आहे. मात्र, उल्हासनगर मेट्रो स्टेशनमधील एका स्थानकाचे नाव सिंधूनगर असं करण्यात येईल, अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ या मार्गिकेचा विस्तार आता उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. कल्याणमधील खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत हा विस्तार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मेट्रो-५ हा प्रकल्प २४.९ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी ८ हजार ४१४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे.

तू मला खूप आवडते, म्हणत तरुणीला प्रपोज केलं, नकार देताच केली जातिवाचक शिवीगाळ
मेट्रोच्या प्रस्तावित मेट्रो स्थानकांपैकी मुख्य स्थानकाचे नाव सिंधु नगर करण्यात येईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उल्हासनगरमध्ये मेट्रो सेवा सुरु करण्याबाबत म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी मेट्रो स्थानकाचे नाव सिंधुनगर करण्याचं आश्वासन दिलं होतं. एमएमआरडीएनेही याबाबत ठोस पावलं उचलत असून मेट्रो स्थानकाचे नाव सिंधूनगर करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

मुंबईकरांसाठीचं मोठं गिफ्ट तयार; कुलाबा-सीप्झ मेट्रोचा मुहूर्त ठरला, या २६ स्थानकांवर थांबणार
सिंधूनगर का?

उल्हासनगरात सिंधी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. फाळणीवेळी पाकिस्तानातील सिंध प्रांतातून स्थलांतरित झालेली ही कुटुंबे आहेत. उल्हासनगरचं नाव सिंधूनगर करावं, अशी मागणी इथल्या नागरिकांची होती.

काळजी घ्या! महाराष्ट्रात करोना पुन्हा टेन्शन वाढवतोय, या कारणांमुळं रुग्ण वाढताहेत
मेट्रोमुळं प्रवासाचा वेळ वाचणार

उल्हासनगरात मेट्रो सुरु झाल्यानंतर अवघ्या तासाभरात मुंबई गाठता येणार आहे. या मेट्रो मार्गावर १७ स्थानकं असतील. त्यामुळं ठाणे ते कल्याण दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. दोन टप्प्यात या मार्गाचं काम सुरु होणार आहे. पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान आहे तर भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. पहिला टप्पा ७१ टक्के पूर्ण झालं आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील वृक्षांच्या कत्तलीनंतर सयाजी शिंदे आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here