सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहरात एका फ्लॅटमध्ये दोन तरुणांनी आत्महत्या केली. एकाने पेटवून घेतले, तर दुसऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋषिकेश राजेंद्र ताटे (वय ३०) मूळ रा. बोधेवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा हल्ली रा. अनन्या रेसिडेन्सी मार्केट यार्डसमोर, कोरेगाव, तर त्याचा मित्र सुभाषकुमार सुरज प्रसाद उर्फ अंशु (वय २०) रा. बदलेपूर सिनापूर, ता. घाटमपूर, जि. कानपूर (उत्तरप्रदेश) असे मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

फ्लॅटमध्ये लागलेली आग पोलीस व शेजारील लोक विझवत होते. आग विझल्यानंतर फ्लॅटमध्ये आत जाऊन पाहिले असता फ्लॅटच्या हॉलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सुभाषकुमार हा मृतावस्थेत लटकत असल्याचे दिसले. तर आतील बेडरुमच्या दारात ऋषिकेश हा होरपळून मृतावस्थेत पडला होता.

पोलिसांनी सांगितले की, कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर ऋषिकेश हा त्याची आई संगीता, भाऊ रोहन, धाकटा भाऊ सागर, आत्या मिना जगन्नाथ ताटे यांच्यासह एकत्र राहतात. सागर याचे वाठार स्टेशन येथे हॉटेल आहे. भाऊ ऋषिकेश व त्याचा मित्र सुभाषकुमार सुरज प्रसाद उर्फ अंशु हे सुमारे दीड वर्षापासून मित्र आहेत.

सुभाषकुमार सुरज प्रसाद हा कोरेगावमध्ये सुरुवातीला फरशी बसविण्याचे काम करीत होता. त्याचा मामा राजस्थानला गेल्याने ऋषिकेश याच्या सांगण्यावरून त्यास सुमारे पाच महिन्यापासून सागर याच्या हॉटेलवर कामास ठेवले होते. त्याची रूम जळगाव नाका परिसरात असून तो कामानिमित्त दररोज वाठार स्टेशन येथे जा-ये करीत असे. सुभाषकुमार प्रसाद याचे नेहमीच घरी येणे-जाणे असत. त्यामुळे तो अधूनमधून ऋषिकेश याच्या घरी राहतही असत.

मूळ गावची यात्रा असल्याने सर्व कुटुंबीय रविवार, दि. 19 रोजी सकाळच्या सुमारास सुरूर (ता. वाई) येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन आल्यानंतर सर्व कुटुंबीय कोरेगाव येथे आले. येथून सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सर्वजण बोधेवाडी येथे आले. त्यांच्यासोबत सुभाषकुमार हा देखील होता. बोधेवाडी येथे जेवण झाल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास ऋषिकेश व त्याचा मित्र सुभाषकुमार सुरज प्रसाद हे दोघे कोरेगाव येथील फ्लॅटवर मुक्कामास आले होते.

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं
आज सोमवार, दि. 20 रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास गावी असताना ऋषिकेश याचा भाऊ सागरला फ्लॅट समोर राहणारे दिनेश कुंभार यांनी फोन करून अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 17 मध्ये आग लागली असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच ऋषिकेशचा भाऊ रोहन ताटे, सागर ताटे, मित्र जितेंद्र नलवडे, संतोष नामदे हे कोरेगाव येथे फ्लॅटवर आले. तेव्हा फ्लॅटमध्ये लागलेली आग पोलीस व शेजारील लोक विजवत होते. आग विझल्यानंतर फ्लॅटमध्ये आत जाऊन पाहिले असता फ्लॅटचे हॉलमध्ये गळफास घेतले अवस्थेत सुभाषकुमार सुरज प्रसाद हा मृतावस्थेत लटकत असल्याचे दिसले. तर आतील बेडरुमच्या दारात भाऊ ऋषिकेश हा होरपळुन व भाजून मृतावस्थेत निपचीत पडल्याचे दिसले.

ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षांच्या लेकरानं अखेर बोअरवेलमध्येच जीव सोडला; एनडीआरएफचे आठ तासांचे प्रयत्न निष्फळ

याबाबत रोहन राजेंद्र ताटे यांनी या घटनेची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस निरीक्षक बिराजदार तपास करत आहेत. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरुणांनी आत्महत्या का केली? याबाबत कारण अद्याप स्पष्ट झाली नाही. दोन तरुणांनी एकाचवेळी एकाच रुममध्ये आत्महत्या करणे संशयास्पद असल्याने याबाबत सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मला चांगल्या पगाराची नोकरी, पण मन लागत नाही; पिंपरीत २७ वर्षीय अभियंत्याने आयुष्य संपवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here