चिपळूण, रत्नागिरी : कोकणातील मुंबई-गोवा महामार्गवर अनेकदा अपघात घडले यामध्ये अनेक जणांचा जीवही गेला आहे. आता पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे स्कूल बसला अपघात झाला आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून १४ विद्यार्थी बचावले आहेत.

कापसाळ येथे कार आणि स्कूल बसमध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात स्कूल बसमधील १४ विद्यार्थी बचावले आहेत. चिपळूणमध्ये महामार्गावर झालेल्या या अपघातात विदर्भ कोकण बँकेची बोलेरो उलटली. ही धडक इतकी जोरदार होती की धडकेनंतर बोलेरो अक्षरशः उलट्या दिशेला फिरून उलटली.

सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी काही ठिकाणी रस्ता बंद ठेवून कामं केली जात आहेत. मात्र त्याबाबचे दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत. हाही अपघात यातूनच झाला. सोमवारी हा अपघात झाला.

बाईकसमोर बैल आडवा, तरुणाचा भीषण अपघात; नर्स पत्नीचे शर्थीचे प्रयत्न, पण काळापुढे हात टेकले
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा वाहनाचा चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडच्या दिशेने निघाला होता. कामथे येथे येताच स्कूलची बस अचानक विरुद्ध दिशेने आल्याने समोरासमोर धडक झाली. यात कार जागीच उलटली. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदत केली. यावेळी स्कूल बसमधील १४ विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. अपघातात कारमधील बँकेचे काही अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील, हम दो हमारे दो राहतील, मग कुटुंब हीच जबाबदारी : एकनाथ शिंदे

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here