अमरावती: चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत शिंदे गटासोबत गेलेले आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. १५ संचालकांकरीता १९ मार्च रोजी झालेल्या मतदानानंतर सोमवारी मतमोजणी झाली. सहकार व शेतकरी पॅनलच्या चुरशीच्या लढतीत बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे १२ संचालक तर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी पॅनलचे तीन संचालक विजयी झाले. काँग्रेस आणि प्रहारने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या गृह तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत प्रहारचे अवघे तीन उमेदवार निवडून आले. यावेळी जल्लोष करताना विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशी नारे बाजी केली.

सुरुवातीपासूनच अटीतटीच्या लढतीत अखेर तालुका खविसवर बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे, यांचे सहकार पॅनलने प्रहारचा धुव्वा उडवून सहकार पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत विविध मतदान केंद्रावर प्रहार व सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, तळवेल केंद्रावर बबलू देशमुखच्या गटाला १० टक्के मते प्राप्त झाल्याने हा विजय सुकर झाला. बहुतांश ठिकाणी सहकार व शेतकरी पॅनलमध्ये जयपराजयासाठी एका मताचा फरक होता.
८० टक्के आमदार, खासदारांना पेन्शनची गरज नाही, मलाही पेन्शन नको, बच्चू कडू यांची जाहीर भूमिका

विजयी उमेदवारांची नावे व त्यांची मिळालेली मते याप्रमाणे आहेत.

सहकार पॅनेलचे प्रताप अण्णासाहेब किटुकले (२८), श्रीपाद रामचंद्र आसरकर (२७), राजेंद्र प्रल्हादराव खापरे (२७), कुलदीप प्रदीपर्पत सोनार (२७). शेतकरी पॅनलचे अनंत खुशालराव काळे (२७), प्रभाकरराव किटुकले (२७), साहेबराव नानाजी पोहोकार (२७) यांचा समावेश आहे. या ठिकाणी एकही मत बाद झाले नाही. तसेच वैयक्तिक भागधारक मतदार संघात सहकार पॅनलचे आठ ही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये वैयक्तिकचे, सतीश रविंद्रपंत गणोरकर (२१४१) मते, संजय बिरसाजी गुजर (२०३०), रावसाहेब नामदेवराव लंगोटे ( २१११),

८० टक्के आमदार- खासदारांना पेन्शनची गरज नाही, बच्चू कडूंची रोखठोक भूमिका

महिला टेबलवर राखीव मध्ये सुनिताबाई बाबुराव काळे (२१५४), अनिताताई स्वप्निल देशमुख (२१७०), विमुक्त जाती जमाती मध्ये विलास विक्रमजी शेकार (२२२२), अनुसूचित जाती जमाती मध्ये श्रीकृष्ण ढोंगाजी वानखडे (२१५५), तर इमावमध्ये
शिवाजी सुधाकरराव बंड (२२३८) यांचा समावेश आहे. वैयक्तिक मध्ये एकूण ५५८ मते बाद झालीत. सदर मतमोजणी एकूण ७ करण्यात आली.
तुम्ही गद्दारांसोबत जायला नको होतं; धाराशीवनंतर नाशिकमध्येही शेतकऱ्यानं बच्चू कडूंना घेरलं
निवडणूकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, आर. व्ही. भुयार सहायक निबंधक मोर्शी यांनी जाहीर केला. त्यांना मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात अविनाश महल्ले सहायक निबंधक, दिपक चांभारे सहायक निबंधक, उदय शिवणकर सहायक निबंधक यांनी सहकार्य केले. मतमोजणीला सहकार विभागाचे ऐकूण ३१ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया एस.टी.केदार सहायक निबंधक यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली. मतमोजणीवेळी स्थानिक पोलिस प्रशासनाने, कायदा व सुव्यवस्था चोख राखली तर सहकार पॅनलने विजयाचा जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here