दुसरी वनडे झाल्यानंतर रोहितने म्हटले होते की, श्रेयस अय्यर कधी संघात परतेल याबाबत आम्हाला कल्पना नाही. श्रेयसची जागा रिकामी आहे आणि तेथे आम्ही सूर्यला संधी देणार आहोत. मी ही गोष्ट अनेक वेळा बोललो आहे की ज्याची क्षमता असेल त्याला संधी मिळेल. सूर्याला देखील कल्पना आहे की वनडेत चांगली कामगिरी करायची आहे. क्षमता असलेल्या खेळाडूंना कधीच असे वाटता कामा नये.
चेपॉकवरील पिच साधारणपणे संथ असते. पण उद्या मॅचच्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्याचा अर्थ डावाच्या सुरुवातीला जलद गोलंदाजांची भूमिका फार महत्त्वाची होईल. भारताने येथे खेळलेल्या अखेरच्या लढतीत जलद गोलंदाजांना मदत मिळाली होती. अर्थात तेव्हा वेस्ट इंडिजने २८८ धावांचे लक्ष्य फक्त २ विकेट गमावत पार केले होते. जर यावेळी देखील जलद गोलंदाजांना मदत मिळाली तर भारताच्या फलंदाजांना सुरुवातीची १० षटके संभाळून खेळावी लागतील.
कोण होणार संघाबाहेर
तिसऱ्या वनडेत भारत आक्रमक रणनितीचा वापर करू शकते आणि यासाठी ३ जलद गोलंदाज संघात असू शकतील. याचा अर्थ संघात शार्दुल ठाकूर किंवा उमारन मलिक यांना संधी दिली जाऊ शकते. त्यात ही मलिकला अधिक संधी मिळू शकते कारण त्याच्याकडे वेग आहे आणि जो या पिचवर उपयोगी ठरू शकतो.
उमरान किंवा शार्दुलला संधी दिली तर अक्षर पटेल संघाबाहेर होऊ शकतो. या शिवाय संघ व्यवस्थापन कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम ११ मध्ये स्थान देऊ शकतो. सुंदर गोलंदाजी सोबत फलंदाजीत योगदान देऊ शकतो. फलंदाजीच्या लाइनअपमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
या खेळाडूंमधून होणार अंतिम ११ची निवड
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट