नाशिकः नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होत आहे. अशातच आता अवकाळी पावसामुळे जीवितहानी देखील झाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात असलेल्या सराड गावी रविवारी १९ मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडून सावळीराम निंबा भोये या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सावळीराम भोये हे घरातील कुणालाही न सांगता आपल्या शेतात गेले होते. यावेळी सुरगाणा तालुका परिसरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह बे मोसमी पावसानं हजेरी लावली यावेळी आंब्याच्या झाडाखाली असताना सावळीराम भोई यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, बराच काळ होऊन देखील सावळीराम भोये हे घरी परत येत नसल्याने सायंकाळी घरच्यांनी शेतात आणि परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र ते आढळून आले नाहीत. त्यांना भजनाचा छंद असल्याने ते भजनात गेले असावेत, सकाळी घरी परत येतील असा अंदाज घरच्यांनी व्यक्त केला होता. मात्र सोमवारी २० मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान शेतात त्यांचा शोध घेतला असता शेतातीलच आंब्याच्या झाडाजवळील खोल खड्डयात गवतात त्यांचा मृतदेह आढळून आला.

पायावरुन कार गेली, शस्त्रक्रिया केली, वेदनेने तडफडणाऱ्या मुलीने रुग्णवाहिकेतून दिला १०वीचा पेपर
याबाबतची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर सुरगाणा पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेहावर शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सावळीराम भोळे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सराड गावावर शोककळा पसरली आहे. अवकाळी पावसाला सर्वत्र थैमान घातलेले असताना याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे शेती पिकाचे नुकसान होत असताना सुरगाणा तालुक्यात जीवित हानी झाली आहे. विजांच्या कडकडाटासह बे मोसमी पावसात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

अज्ञात महिला घरात घुसली अन् घडला एकच थरार; आईला बेशुद्ध केले अन् ३ महिन्यांच्या मुलीला संपवले

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here