अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे आंबा पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. साधारण डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आंबा पिकाला चांगला मोहर येतो. मात्र वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे आणि फळ लागण्याच्या काळात मोहर गळून पडल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे तसेच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून याचा प्रभाव बाजारात दिसून येत आहे.
उद्या गुढीपाडवा असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले असून गुढीपाडव्यानिमित्त आंबा मार्केटला नागरिकांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याने आंबा उत्पादनात घट झाली आहे. यामुळे गतवर्षापेक्षा तीस ते चाळीस टक्के उत्पन्नामध्ये घट झाली असून दरामध्ये मोठे वाढ झाली आहे.
पुणेकरांचा नादच खुळा! आंब्याच्या एका पेटीला ४१ हजाराची बोली, एक आंबा ६२१ रूपयांना
सध्या बाजारात एक डझनाला आंबा अंदाजे १ हजार ते १५०० रुपयांपर्यंत मिळत असून आणखी काही दिवस हाच दर राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणत आवक झाली आहे, तर पेटीचा दर सरासरी तीन हजार रुपये तर बॉक्सचा दर सरासरी सहाशे रुपये आहे. तसेच ऑरगॅनिक आंबा हा प्रती डझन १००० ते १३०० आहे. यामुळे आंबा सामान्यांच्या आवाक्या बाहेर झाला असून फळांचा राजा आंबा हा नागरिकांच्या खिशाला न परवडणारा झाला आहे.