बीड: शेत तलावात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दुपारी सावळेश्वर पैठण तालुका केज येथे घडली आहे. या घटनेने केज तालुका सुन्न झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आहेत

केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथील स्वराज जयराम चौधरी, श्लोक गणेश चौधरी, पार्थ श्रीराम चौधरी असे पाच ते सहा वर्षांचे बालक यांचा शेततळ्यात मिळून मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या वेळेस घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुढीपाडवा शोभायात्रांवर पावसाचे सावट, कुठे आहे पावसाची शक्यता? पाहा हवामान अंदाज
अवघ्या पाच ते सहा वर्षाची ही बालक या शेततळ्यापाशी खेळण्यासाठी गेली असताना यात एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात हे तिन्ही बालक शेततळ्यात बुडून यांचा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी धाव घेत या तिन्ही मृतदेहांना बाहेर काढत पंचनामा करत हे तिन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंबरनाथ-बदलापूर एकत्र महापालिका? मुख्यमंत्र्यांची स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here