तिघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्वराज जयराम चौधरी (९ वर्ष), पार्थ श्रीराम चौधरी (७ वर्ष) आणि कानिफनाथ गणेश चौधरी (७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच युसूफवडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, एएसआय डोईफोडे, जमादार म्हेत्रे व घोरपडे यांनी घटनास्थळी जाऊन तीनही बालकांचे मृतदेह हौदाबाहेर काढून बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पैठण गावावर शोककळा पसरली आहे.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
विशेष म्हणजे मृत पावलेले तिघेही सख्खे चुलत भाऊ आहेत. पैकी एका मुलाला एक भाऊ आहे, तर दोघांना बहिणी आहेत. एकाच परिवारातील तीन चिमुकल्यांच्या अकाली निधनामुळे चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची स्थिती पाहून गावातील अनेकांचे डोळे पाणावले. ही घटना वाऱ्यासारखी गावासह केज तालुक्यात पसरली. त्यानंतर आसपासच्या गावांतील रहिवासी बघता बघता घटनास्थळी दाखल झाले. चिमुकल्यांचे निष्प्राण देह पाहून सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले.