छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुण शेतकरी दाम्पत्याने शेतात आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. झालं असं की, आपल्या ४ वर्षीय एकुलत्या एक मुलाला आपल्या भावाच्या घरी सोडून रात्री शेतात राखण करण्यासाठी जातो म्हणून दोघे निघाले. मात्र, सकाळी शेतात दोघांचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. दोघांनी ही आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीय.

ही घटना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील महालब्धा गावात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संदीप आळेकर (वय २८) आणि लता आळेकर (वय २५) असं मृत दाम्पत्याचे नाव आहे.

लॉंग मार्चमध्ये शेतकऱ्याचा अखेरचा श्वास; कुटुंबियांचे अश्रू अनावर, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती अशी की, आळेकर यांनी कसण्यासाठी जमीन घेतली होती. दोघेही पती-पत्नी ही जमीन कसत होते. मात्र, काही दिवसांपासून जिल्ह्यासह सोयगाव भागात जोरदार पाऊस झाला. शिवाय काही भागात गारपीट देखील झाली आहे. या अवकाळी पावसाने त्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे आळेकर हे चिंतेत होते. मंगळवारी रात्री संदीप आणि लता दोघांनी आपल्या चार वर्षीय एकुलत्या एक मुलाला संदीप यांनी आपल्या भावाकडे दिले.

त्यानंतर, ते दोघेही रात्री शेतात गेले. मात्र, आज सकाळ झाली तरी दोघेही घरी आले नसल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता संदीप यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले तर लता या जमिनीवर निपचित अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक भरत मोरे यांनी दिली आहे.

Thank You रासनेसाहेब, तुमच्यामुळे मला देश ओळखायला लागला, धंगेकरांचा चिमटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here