मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना शिवसेनेची सध्याच्या झालेल्या स्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा यावरुन झालेल्या वादानं वेदना झाल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी अनेकांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी स्थिती निर्माण केल्याचं राज ठाकरे म्हणाले. दुसरीकडे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळालंय तर जनतेची कामं करा, असा सल्ला दिला. मागच्या सरकारच्या काळात मनसेच्या कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याचं आवाहन केलं. याशिवाय माहिमच्या समुद्रात जे अतिक्रमण करण्यात आलंय ते एका महिन्यात हटवण्याचा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी दिला. ते न झाल्यास तिथं मोठं गणपती मंदीर उभारु असं राज ठाकरे म्हणाले. आजच्या भाषणातून मनसैनिकांना राज ठाकरेंनी हाती घेतलेले विषय सोडले नसल्याचा संदेश दिला. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा असल्यानं त्यासंदर्भात मनसैनिकांना संबोधन आजच्या सभेत झाल्याच दिसून आलं नाही.

उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यातील गेल्या अडीच तीन वर्षांपासून जे राजकारण सुरु आहे त्यावरुन राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेनं एकत्रितपणे निवडणुका लढल्या होत्या. मात्र, आपल्या शिवाय भाजप सत्ता स्थापन करु शकत नाही हे लक्षात आलं की उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा काढला. बाळासाहेब असते तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन दिलं असतं का, असा सवाल राज ठाकरेंनी केला. शिवसेनेच्या आजच्या स्थितीला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलं.

एकनाथ शिंदेंना सल्ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला. मुख्यमंत्रिपद तुम्हाला मिळालं आहे तर शेतकऱ्यांची कामं करा, पेन्शनचा प्रश्न मिटवा, असं राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे जिकडं सभा घेतील तिकडे सभा घेत फिरु नका, असं राज ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

महाराष्ट्रात मागच्या सरकारच्या काळात मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे राज्य सरकारनं मागं घ्यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. माहिमच्या समुद्रात जे अतिक्रमण सुरु आहे ते येत्या महिनाभरात हटवण्यात यावं, अशी मागणी देखील राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

उद्धव ठाकरेंवर तुफान टीका, फडणवीसांना कळकळीची विनंती, नांदगावकरांची शिवतीर्थावर डरकाळी!

मनसैनिकांना काय संदेश ?

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा सोडला नसल्याचा संदेश आजच्या भाषणातून दिला. मनसैनिकांनी दक्ष राहावं, असं देखील राज ठाकरे म्हणाले. राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यानं सरकारचं लक्ष तिकडं असल्यावरुन राज ठाकरेंनी टीका केली. आताच विधानसभा निवडणुका घेण्याचं आव्हान राज ठाकरेंनी दिलं.

हाजी अलीजवळ समुद्रात अनधिकृत बांधकाम तोडा, नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु, राज ठाकरेंचा इशारा

राज ठाकरेंनी मनसेच्या गेल्या वर्षीच्या गुढीपाडवा मेळाव्यात अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाला ६ जूनला रायगडावर जाणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा गुढीपाडवा मेळावा असून देखील मनसैनिकांना त्यासंदर्भात राज ठाकरेंनी संबोधन करण्याची संधी साधली नसल्याच्या चर्चा सुरु होत्या.

राणेंनी सेना कशी सोडली? उद्धव ठाकरेंचा रोल काय? राज ठाकरेंनी एक एक करुन सगळं सांगितलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here