दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे आयुक्तांना भेटायला जातात, त्यानंतर लगेचच आज पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेतात. काहीतरी गडबड आहे हे न समजण्याइतकी लोकं मुर्ख नाहीत. जसं जसं दिवसं जात आहेत तसे टी गँग पुरावे नष्ट करत आहेत. म्हणून रोज धडपड सुरु आहे, असं ट्विट करत निलेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
एकीकडे भाजपकडून सातत्यानं मुंबई पोलिस व राज्य सरकारवर आरोप होत असताना. आघाडीतील नेत्यांनी मात्र मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचं कुणीही राजकारण करू नये.असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे. तसंच, बिहारच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असून या प्रकरणाला राजकीय रंग देऊन कोणीही राजकीय पोळी भाजू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बिहार पोलिसांना क्वारंटाइन केलं
दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई पालिकेने क्वॉरंटाइन केलं आहे. त्यामुळे तिवारी यांना १४ दिवस क्वॉरंटाइन राहावं लागणार असून बाहेर जाऊन तपास करता येणार नाही. बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे काल रविवारी पटना येथून मुंबईत तपासासाठी आले होते. ही माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी काल रात्री ११ वाजता तिवारी यांना गोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये क्वॉरंटाइन केलं आहे. तसेच तिवारी यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्काही मारण्यात आला आहे. दरम्यान, विनंती करूनही आपल्याला आयपीएस मेस उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.