चंद्रपूर : राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याच्या सण साजरा होत असताना चंद्रपूर जिल्ह्यात एक दुःखद घटनेनं यावर विरजण टाकले. चंद्रपूर येथून आपल्या चारचाकीवर गावाकडे परतलेल्या डॉक्टर असलेल्या दाम्पत्यावर काळ कोपला. भरधाव ट्रकने त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत डॉ. अतुल गौरकार आणि अश्विनी गौरकार असं मृतक डॉक्टरांचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. अतुल गौरकार आणि त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी गौरकार हे दोघे आपल्या चारचाकी वाहनाने वरोरा येथे आले होते. परतीच्या प्रवासात नव्या महामार्गावर त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत डॉ. अश्विनी गौरकार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर डॉ. अतुल गौरकार हे गंभीररित्या जखमी झाले होते.

राणेंनी सेना कशी सोडली? उद्धव ठाकरेंचा रोल काय? राज ठाकरेंनी एक एक करुन सगळं सांगितलं
डॉ. अतुल यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला. डॉ. अश्विनी गौरकार या मारेगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. हा अपघात वरोरा तालुक्यातील शेंबळ गावाजवळ झाला. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनेच्या पंचनामा त्यांनी केला. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत. जिल्ह्यात नववर्षाचे जोरदार स्वागत सुरू आहे. अशात डॉक्टर पती-पत्नीच्या मृत्यूच्या बातमीने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

हाजी अलीजवळ समुद्रात अनधिकृत बांधकाम तोडा, नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु, राज ठाकरेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here