अविनाश जाधव यांच्यावर ३५३ कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळ अविनाश जाधव यांना न्यायलयीन कोठडी मिळाली असून त्यांची रवानगी तळोजाला करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशामनुसार सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून ६ ऑगस्टला याबाबत सुनावणी होणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
वाचाः
या सगळ्या घडामोडीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरेंच्या सूचनेनुसार, नांदगावकर यांनी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. तसंच, अविनाश जाधव यांना निरोपही पाठवला. ‘अविनाश, मै हू ना’ अशा शब्दांत राज यांनी जाधव यांना धीर दिला.
वाचाः
दरम्यान, वसई-विरार महापालिकेत आंदोलन केल्याप्रकरणी जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालानं जाधव यांना ४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर परिचारिकांसाठी आंदोलन करत असताना जाधव यांना ही नोटीस मिळाली. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यास सांगितलं आहे. लोकांच्या हितासाठी आंदोलन करत असल्यामुळं राज्य सरकारनं बक्षीस दिल्याचं जाधव यांनी म्हटलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I like the valuable information you provide in your articles.
Thanks so much for the blog post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.