नवी दिल्ली: आयपीएलमध्ये अनेकदा नाणेफेकीचा निर्णय सामन्यांचा निर्णयात निर्णायक ठरतो, अशी टीका होत असते. त्यामुळेच आता नाणेफेकीनंतर आपला अंतिम संघ जाहीर करण्याची मुभा प्रतिस्पर्धी कर्णधारांना देण्यात येणार असल्याचे समजते. नाणेफेक झाल्यावर प्रतिस्पर्धी कर्णधार आपला संघ जाहीर करणार आहेत.

पारंपारीक संकेतानुसार नाणेफेकीपूर्वी प्रतिस्पर्धी कर्णधार आपला संघ एकमेकांना देतात. मात्र आता नाणेफेकीनंतर फलंदाजी तसेच गोलंदाजीचा निर्णय झाल्यावर कर्णधार संघ जाहीर करतील. त्यामुळे ‘इम्पॅक्ट खेळाडूं’चा जास्त प्रभावी वापर होईल, असाही विचार आहे. आयपीएल प्रशासकीय समितीने यंदाच्या लीगमधील संभाव्य नियमावली संघांना पाठवली आहे. त्यात संघांना प्रथम फलंदाजी अथवा गोलंदाजी यानुसार संघनिवडीची मुभा असेल, असे म्हटले आहे. त्यात इम्पॅक्ट खेळाडूही अंतिम संघ जाहीर करतानाच निवडण्याची मुभा असेल असेही सांगितले आहे.

क्रिकेटमध्ये सर्व विक्रम मोडले जातील, पण हा रेकॉर्ड मोडणे अशक्य; भारताच्या गोलंदाजाने…
आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीग क्रिकेटचा विचार केल्यास हा नियम नवा नाही. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या एसए टी-२० मध्ये याची सुरुवात झाली होती. त्यात प्रतिस्पर्धी कर्णधार तेरा नावांसह येत असत. नाणेफेक झाल्यावर ते अंतिम ११ जणांची नावे घोषित करीत असत. नाणेफेकीचा निकालावरील परिणाम कमी करण्यासाठी हा प्रयोग केल्याचे स्पर्धा संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी सांगितले होते.

दवाचा निकालावरील प्रभाव कमी करण्यासाठी आयपीएल हा नियम आणत आहे. फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आता संघ सुरुवातीस अतिरीक्त फलंदाजीची निवड करू शकतील आणि इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गोलंदाजाची निवड करतील. धावांचे संरक्षण करताना हाच गोलंदाज संघात येऊ शकेल. यापूर्वी याचवेळी प्रथम गोलंदाजी आल्यास संघाला अतिरिक्त गोलंदाजांचा फायदा मिळत नसे.

प्ले ऑफमध्ये क्वालिफाय न झाल्यानं शिखर धवनची वडिलांनी केली धुलाई

वेळ पाळा अन्यथा क्षेत्ररक्षण मर्यादा

आयपीएलच्या लढती लांबल्यास त्याचा दूरचित्रवाणी प्रेक्षक संख्येवर परिणाम होतो. त्यामुळे संघांनी वेळेत षटके पूर्ण करावी यासाठी नवा नियम येत आहे. सातत्याने संघाने षटकांसाठी किती वेळ घेतला याचा आढावा घेतला जाईल. षटके वेळेत नसल्यास संबंधित षटकाच्यावेळी तीस यार्डाबाहेर चारच क्षेत्ररक्षक ठेवण्याचे बंधन गोलंदाजी करणाऱ्या संघावर असेल. गोलंदाजांने रन-अप सुरू केल्यावर यष्टीरक्षकाने हालचाल केली असल्यास चेंडू डेड ठरवण्यात येईल आणि पाच धावांचा दंड करण्यात येईल. हाच नियम क्षेत्ररक्षकांबाबतही असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here