चंद्रपूर : राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढल्या असताना महाराष्ट्राला हादरवणारी घटना चंद्रपुरात समोर आली आहे. इथे चक्क मंदिरात दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली गावात जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आली. यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर खुजे, बाबुराव खारकर अशी मृतकांची नावं असून ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मठात असलेली दानपेटी फोडलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे दानपेटी फोडायला आलेल्या चोरांनी हत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. भद्रावती तालुक्यातील मांगली येथील मधुकर खुजे, बाबुराव खारकर यांची शेती गावात गावातील जगन्नाथ महाराज मठा लगत आहे.ते रोज शेतात जागलीसाठी जातात. मंदिर लागून असल्याने तिथे विसावा घेतात.

अबब! चंद्रपुरात रात्रीच्या अंधारात काय दिसलं पाहा, अभ्यासकही आश्चर्यचकित…
बुधवारला पहाटेला मंदिरामध्ये या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर फोडलेल्या स्थितीत आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी स्वानपथक बोलावले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या पतीची गर्भवती पत्नी पाहत होती वाट, तेवढ्यात आला रावसाहेब दानवेंचा फोन कॉल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here