मुंबईः राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून १० हजार २२१ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण करोनाची लढाऊ जिंकून घरी परतले असून राज्यातील रिकव्हरी रेट एक टक्क्यानं वाढून ६३. ७६ टक्के इतका झाला आहे. (Coronavirus update in maharashtra)

करोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण बरे होण्याचा आकडा वाढला आहे. आजही नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं चित्र आहे. आज राज्यात ८ हजार ९८६ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख ५० हजार १९६पर्यंत पोहोचली आहे. राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ००९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचाः

रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढत असले तरी राज्यातील मृत्यूदर अद्यापही स्थिर आहे. आज राज्यात २६६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर ३. ५२ टक्के इतका झाला आहे. त्यामुळं राज्यातील करोनामृतांचा आकडा १५ हजार ८४२ इतका झाला आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण बरे झाले असून सध्या १ लाख ४७ हजार १७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.

वाचाः

(आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७० (४६), ठाणे- २०३ (५), ठाणे मनपा-२४४ (५),नवी मुंबई मनपा-३२२ (७), कल्याण डोंबिवली मनपा-२४७ (२),उल्हासनगर मनपा-५४ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२३ (२) , मीरा भाईंदर मनपा-१३० (४),पालघर-१३२, वसई-विरार मनपा-२२७ (३), रायगड-२३२ (३), पनवेल मनपा-१७३ (२), नाशिक-११४(३),नाशिक मनपा-३२३ (३), मालेगाव मनपा-२५, अहमदनगर-१८४ (१), अहमदनगर मनपा-१८६ (१), धुळे-१२ (१), धुळे मनपा-१२, जळगाव-२८० (६), जळगाव मनपा-१७३, नंदूरबार-३ (४), पुणे- २३१ (७), पुणे मनपा-७९६ (४०), पिंपरी चिंचवड मनपा-७३१ (१३), सोलापूर-२०२(४), सोलापूर मनपा-६२ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-३९५ (५), कोल्हापूर मनपा-१५६ (४), सांगली-११४ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-३६५ (५), सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-३१ (२), औरंगाबाद-८१, औरंगाबाद मनपा-२३७ (३), जालना-१९ (१), हिंगोली-१००, परभणी-१, परभणी मनपा-१०,लातूर-७६(५), लातूर मनपा-३१ (२), उस्मानाबाद-३५ (१), बीड-४१ (१), नांदेड-१२३ (१), नांदेड मनपा-१०३ (४), अकोला-२५ (१), अकोला मनपा-१७ (१), अमरावती- ३७ (२), अमरावती मनपा-६३, यवतमाळ-३ (२), बुलढाणा-५१, वाशिम-८ (१), नागपूर-१०८ (९) , नागपूर मनपा-१७६ (४१), वर्धा-३, भंडारा-७, गोंदिया-६१, चंद्रपूर-१३, चंद्रपूर मनपा-३, गडचिरोली-१०, इतर राज्य १० (३).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here