Ratnagiri News : जैतापूरमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी दुर्दैवी घटना घडली. मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. यामुळे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस तपासत अखेर तरुणाचा मृतदेहच हाती आला.

राजेंद्र लासे हा तरुण बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मुळे म्हणजेच शिंपल्या काढण्यासाठी खाडीत गेला होता. पण तो संध्याकाळ होऊनही घरी परतला नाही. यामुळे ४५ वर्षीय भाऊ महेंद्र अंकुश लासे यांनी नाटेतील सागरी पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. त्यानंतर नाटे पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली. त्याचा शोध सुरू असता याच खाडीच्या दरम्यान त्याचा मृतदेह मिळाला आहे. या राजापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास नाटे सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील करीत आहेत. जैतापूर सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जैतापूर पोलीस करत आहेत.
दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील, हम दो हमारे दो राहतील, मग कुटुंब हीच जबाबदारी : एकनाथ शिंदे
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News