Sangli News : राज्यात सध्या पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चर्चेत आहे. पण ही चर्चा स्पर्धेबद्दल कमी आणि महिला कुस्तीगिरांना स्पर्धेच्या ठिकाणच्या समस्यांचीच अधिक आहे. स्पर्धेच्या ठिकाणी काळोख, पाण्याची आणि जेवणाची नीट व्यवस्था नाही. यामुळे ४०० हून अधिक महिला कुस्तीगिरांचे हाल होत आहेत.

 

sangli news
पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंधार!, आल्या ४०० कुस्तीगिर, साधं पाणी अन् नीट जेवणही नाही
सांगली : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत पार पडत आहेत. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास ४०० हून अधिक महिला कुस्तीगिर दाखल झाल्या आहेत. मात्र, कुस्ती स्पर्धांच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. ज्या क्रीडा संकुलाच्या आवारामध्ये कुस्ती स्पर्धा होत आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाइट सुरू नाहीत. यामुळे अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावं लागत होतं. याशिवाय या महिला कुस्तीपटूंच्या जेवणाची सोय करण्यात आली होती, त्या ठिकाणीही अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचं नियोजन पाहायला मिळालं. क्रीडा संकुलाच्या अत्यंत छोट्याशा मेसमध्ये महिला कुस्तीगिरसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे रांगेने ताटकळत ठेवून या मुलींना आत सोडण्यात येत होतं. आसन व्यवस्था नसल्याने महिला कुस्तीपट्टूना खाली बसून जेवण करावं लागलं. पिण्याची पाण्याची व्यवस्थाही नीट नव्हती. जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी ही कुस्तीगिर महिलांना पाण्याची व्यवस्था नव्हती.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर सांगली पालिका ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत मशीद बांधकामावर तोडक कारवाई
महिलांची राहण्याची व्यवस्थाही नीट नसल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. महाराष्ट्र कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडत आहेत. मात्र यामध्ये नियोजनाचा मोठा अभाव दिसून आला. यामुळे महिला कुस्तीगिरांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं.

एसटी चालक नवऱ्याला रजा मिळेना, चिडलेली बायको थेट आगारात; डेपोत अंथरुणावर झोपून आंदोलन

गेल्या सात महिन्यांपासून जिल्ह्याचं क्रीडा संकुल हे अंधारात आहे. आणि याचा फटका महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला बसल्याचं समोर आलं आहे. ज्या ठिकाणी या स्पर्धा पार पडत आहेत त्या क्रीडा संकुलाची लाइट गेल्या सात महिन्यांपूर्वीच खंडित करण्यात आली आहे. सुमारे सहा लाखांचं वीज बिल थकीत असल्याने हे कारवाई वीज वितरण विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र याकडे सरकार अथवा जिल्हा प्रशासन कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. तसेच धक्कादायक बाब म्हणजे कोविडच्या काळात जिल्हा क्रीडा संकुलाची इमारत प्रशासनाने ताब्यात घेतली होती. आणि त्या काळातील विजेच्या वापराचं हे बिल आहे. वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासन आणि राज्य सरकारकडे क्रीडा विभागाकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापपर्यंत याला प्रतिसाद मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here