दिशा बदलल्यानंतर निसर्ग चक्रीवादळ पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांच्या भागातून गेले होते. नगर जिल्ह्यात अकोले आणि संगमनेर तालुक्यातून या वादळाच्या काही भागाचा प्रवास झाला होता. नेमका तोच भाग मुळा आणि भंडारदरा या धरणांच्या पाणलोट क्षेत्राचा आहे. यावर्षी त्या भागात कमी पाऊस झाल्याने धरणांत पाणी येत नाही. दुसरीकडे मात्र, खालच्या भागात पाऊस सुरू असून टक्केवारी वाढत आहे आणि छोटी घरणे, बंधारे भरत आहेत. नगर-नाशिकच्या धरणांतून सोडलेल्या पाण्यावर भरणारे औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणही वरच्या धरणांतून पाणी सोडण्याआधीच पन्नास टक्के भरले आहे. त्यामुळे निसर्ग वादळाचा परिणाम असल्याची चर्चा नगरसह नाशिक जिल्ह्याच्या भागातही सुरू झाली आहे. मात्र, आता हवामान विभागाचे ताजे अंदाज येऊ लागल्याने दिलासाही मिळत आहे.
नगर जिल्ह्यातील धरणे भरण्याचे वेळापत्रक बदलल्याचे उदाहरण यासाठी दिले जात आहे. तज्ज्ञांकडून मात्र याला अद्याप दुजोरा मिळाला नाही. येथील वस्तुस्थिती पहाता नगर जिल्ह्यातील सीना धरणाची क्षमता २ हजार ४०० दशलक्ष घनफुट आहे. यंदा प्रथमच हे धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भरले आहे. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असणाऱ्या मुळा धरणामध्ये सध्या १२ हजार ७३ दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे. या धरणाची क्षमता २६ हजार दशलक्ष घनफुट आहे. याशिवाय ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट क्षमता असणाऱ्या भंडारदरा धरणात ५ हजार ६१० दशलक्ष घनफुट व ८ हजार ३२० दशलक्ष घनफुट क्षमता असणाऱ्या निळवंडे धरणात सध्या ४ हजार २२१ दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे. भंडारदरा धरण हे दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी भरत असते. यंदा मात्र या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे हे धरण १५ ऑगस्टपूर्वी भरणार का, याकडे लक्ष लागले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.