मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं रद्द केली आहे. लोकसभा सचिवालयानं सूरत न्यायालयानं राहुल गांधी यांच्यासंदर्भात दिलेल्या निकालाचा आधार घेत कारवाई केली. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. अजित पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या संदर्भात घडलेल्या घटनेची आठवण करुन दिली आहे.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेमध्ये ही दुसरी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुणाची खासदारकी घालवल्याचं आतापर्यंत पाहायला मिळत नाही. आज ज्या प्रकारचा निर्णय लोकसभेनं घेतलेला आहे तो लोकशाहीला धक्का देणारा आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं अजित पवार म्हणाले.

मोठी बातमी : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, मानहानी प्रकरणी शिक्षेनंतर लोकसभा अध्यक्षांची कारवाई
हे का असं घडायला लागलं आहे, असं कळत नाही, असं अजित पवार म्हणाले. अध्यक्षांच्या समोर मुद्दा उपस्थित करुन सभात्याग केला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. जनता हे बघत नाही असं नाही, जनता हे सगळं बघत असते. राज्यकर्ते असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं, मात्र त्याला तिलांजली देण्याचं काम या सरकारनं केलं आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.

आपण जर पाहिलं तर इंदिरा गांधी यांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीनं ते सरकार वागलं होतं. ते भारतातल्या जनतेला अजिबात आवडलं नाही. १९७७ साली जनतेनं इंदिरा गांधी यांना पराभूत केलं होतं. इंदिरा गांधी यांना देशातल्या जनतेनं १९८० मध्ये प्रचंड मताधिक्क्यानं पतंप्रधानपदावर बसवल्याची आठवण अजित पवारांनी करुन दिली.

बड्या कंपनीचा मॅनेजर वाटेत रक्तबंबाळ, रिक्षावाल्याची माणुसकी, रुग्णालयात नेलं; पण…

दरम्यान, राहुल गांधी यांचं खासदार पद रद्द झाल्यानं त्यांना आता दिल्लीतील शासकीय निवासस्थान सोडावं लागू शकतं. दुसरीकडे वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक देखील जाहीर होऊ शकते.

चोराला चोर म्हणणं आपल्या देशात गुन्हा ठरला; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here