नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात गावी सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यात असलेल्या खंबाळे येथील लष्करी जवान जितेंद्र संपत आंधळे (वय २८ वर्ष) यांचा अपघातात मृत्यू झाल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.सिन्नर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे बायपास जवळ लष्करी जवान जितेंद्र आंधळे यांचा अपघात झाला आहे. गुरुवारी रात्री पत्नी ज्योती, सात वर्षांचा मुलगा पियुष, तीन वर्षांची मुलगी आरोही यांना घेऊन ते जवळच असलेल्या मानोरी येथे सासरवाडीला गेले होते. त्यांना तेथे सोडून परत आल्यानंतर गावातीलच साडू ज्ञानेश्वर उत्तम सांगळे यांना सोबत घेऊन ते कामानिमित्त व नातेवाईकांना भेटण्यासाठी नांदूर शिंगोटे या ठिकाणी गेले होते. तिथून परत येत असताना रात्री दीड वाजताच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील नांदूर शिंगोटे बायपास जवळ समोरून चुकीच्या बाजूने भरधाव आलेल्या कारचा हेडलाईट डोळ्यावर आल्याने आंधळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडकून अपघात झाला.

दरम्यान, अपघातात जवान जितेंद्र आंधळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले ज्ञानेश्वर सांगळे हे देखील जखमी झाले.

पप्पांनी पंखे पुसताना सूसू केली, चिमुकल्याने दादाला सांगितलं; नंतर समजलं बँक मॅनेजरने गळफास घेतला
जवान जितेंद्र आंधळे हे 23 मराठा बटालियन मध्ये केरळ येथे कार्यरत होते. त्यांची कर्नाटक येथे बदली झाल्याने पत्नी व मुलांना गावी ठेवून ते नवीन नियुक्ती झालेल्या ठिकाणी कर्तव्यावर हजर होणार होते. परंतु दुर्दैवाने त्यांचा अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच व्हावी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जितेंद्र आंधळे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर त्यांचे साडू सांगळे यांना प्रथम उपचार करून सिन्नर येथील रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठवले.

ऑन ड्युटी पोलिसाचा मृत्यू; आई, पत्नीसह लहान लेकराची फरफट; जुनी पेन्शन योजनेमुळे कुटुंबाला मदतीची अपेक्षा

जवान जितेंद्र आंधळे यांच्या अपघाती मृत्यूची माहिती त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात आली. दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी खंबाळे येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जितेंद्र आंधळे हे 2011 मध्ये लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या या दुर्दैवी मृत्यून आंधळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई व मोठा भाऊ, असा परिवार आहे.

बाबा फोन उचलत नाहीयेत रे, मुंबईहून मुलाचा मित्राला फोन, घरी जाऊन पाहिलं तर आक्रित घडलेलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here