नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं आज रद्द केली आहे. ‘मोदी चोर का असतात’ अशा आशयाचं वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं दोषी ठरवलं. सूरत कोर्टानं राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाचा आधार घेत लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. प्रियांका गांधी यांनी देखील ट्विट करुन नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. आता राहुल गांधी यांनी ट्विट करुन खासदारकी रद्द झाल्यानंतर आपली भूमिका मांडली आहे. मी भारताच्या आवाजासाठी लढत राहीन, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी जी किंमत चुकवावी लागेल ती चुकवण्यास तयार असल्याचं म्हटलं. राहुल गांधी लोकसभा सचिवालयानं खासदारकी रद्द केल्यानंतर संसदेत दाखल झाले होते.

राहुल गांधी यांचं ट्विट

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक
राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेत्यांची देशपातळीवरील बैठक ऑनलाइन पद्धतीनं सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेस खासदारांनी ससंदेत ते राष्ट्रपती निवासस्थान असा मार्च काढला होता. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध करत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं.

मोठी बातमी : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, मानहानी प्रकरणी शिक्षेनंतर लोकसभा अध्यक्षांची कारवाई

लोकशाहीच्या संरक्षणासाठी आमची लोकं तुरुंगात गेली आहेत. आम्ही देखील गरज पडल्यास लोकशाहीच्या संरक्षणासाठी तुरुंगात जाण्यास तयार असल्याचं मल्लिकार्जून खर्गे म्हणाले. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर महाराष्ट्रात देखील मुंबई, पुणे आणि विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.

चोराला चोर म्हणणं आपल्या देशात गुन्हा ठरला; राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं

ही कारवाई द्वेषभावनेतून : प्रकाश आंबेडकर

सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर केलेले आहे ते अपील करणार आहेत. असं असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. आम्ही त्याचा निषेध करतो. सरकारने किमान उच्च न्यायालयाय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द नसती केली तर सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच अजित पवारांनी इतिहास काढला, ४३ वर्षापूर्वीचा प्रसंग सांगत म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here