सातारा : पाटण तालुका पुन्हा एकदा गोळीबारानं हादरला आहे. लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडत गोळीबार केला. तळमावले (ता. पाटण) येथे गुरुवारी (दि. २३) सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळील परवानाधारक बारा बोअरची रायफल व दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

पोलिसांनी सांगितले की, तळमावले (ता. पाटण) गावाच्या हद्दीत ढेबेवाडी ते कराड जाणाऱ्या रस्त्यावर काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या गेटसमोर लग्नाच्या मिरवणुकीत एकाने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडत गोळीबार केला. जितेंद्र जगन्नाथ कोळेकर (वय ५१, रा. तळमावले) असे हवेत गोळीबार केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तळमावले येथील जितेंद्र कोळेकर याच्याकडे स्वसंरक्षणाची परवानाधारक बारा बोअरची रायफल आहे. त्याने लग्नाच्या मिरवणुकीवेळी त्या रायफलचा गैरवापर करून हवेत तीन बार काढले. तळमावले येथील काकासाहेब चव्हाण सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बंदुकीतून हवेत गोळीबार करत सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच दहशतीचे वातावरण निर्माण करून इतरांच्या जीवास धोका निर्माण होईल, अशी कृती केली. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेलं, संसारात वादाची ठिणगी पडली अन् नवदाम्पत्याचं टोकाचं पाऊल,रात्रीत सारं संपलं

घटनेची माहिती मिळताच पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड यांच्यासह ढेबेवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी तपास करीत आहेत. या आठवड्यातली पाटण तालुक्यातील ही दुसरी घटना आहे जिल्ह्यातील तिसरी घटना असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, महाराष्ट्र काँग्रेसमधील बड्या नेत्याची मागणी

दरम्यान, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित अबाधित रहावी, कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी सद्यस्थितीत जिल्हयात घडणा-या घटनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी सातारा जिल्हा स्थलसिमा हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे मनाई आदेश दि. २२ रोजी ६ वाजल्यापासून ते दि. ५ एप्रिलपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत सातारा जिल्हयात लागू केला आहे.

प्रतिक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, वैष्णवी पाटीलवर केली मात

मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार; छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here