सुरुवातीला तपासादरम्यान केवळ १.०४ कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. ज्यामध्ये त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या खात्यात किती रक्कम जमा झाली हे उघड झाले होते. मात्र नंतर कळाले की चौहान याने सुमारे २९ खात्यांमध्ये पैसे जमा केले होते. ही किंमत तब्बल ५ कोटींवर पोहोचला होता. यामध्ये तो स्वत:च्या खात्यात आणि पत्नी, मेहुणा, भाऊ आणि इतर नातेवाईकांच्या खात्यात पैसे जमा करत असे. मिलाप चौहान याच्या या कामात जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर दोन कर्मचारीही सहभागी असल्याची माहिती आहे.
मनपाची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार; छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
पत्नी आणि नातेवाईकांसह २९ जणांवर गुन्हा दाखल
मिलाप चौहानचा घोटाळा उघडकीस येताच जिल्हाधिकारी इलैया राजा टी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम तयार केली होती. या पथकाचे नेतृत्व एडीएम राजेश राठोड करत होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर राठोड यांनी स्वत: मिलाप चौहान यांच्याकडे सखोल चौकशी केली. तसेच, तांत्रिक तपासही केला. जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे रावजी बाजार पोलीस ठाण्यात मिलाप चौहान आणि त्यांच्या पत्नीसह एकूण २९ जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीदरम्यान मिलापने अधिकाऱ्यांना सांगितले की, तो खातेदारांनाही काही रक्कम देत असे आणि ही रक्कम घोटाळ्याची नसून ती सरकारी रक्कम असल्याचं तो सांगत होता. हे कोणाच्याही लक्षात येणार नाही, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे सांगून तो खातेदारांना विश्वासात घेत असे, असं त्याने सांगितलं.
कॉल गर्ल आणि गर्लफ्रेंडच्या खात्यातही पैसे ट्रान्सफर केले
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी घोटाळेबाज बाबू मिलाप चौहान याला अटक केली आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपीने आपली फेरफार केलेली रक्कम ही मालमत्ता आणि बाहेरगावी फिरण्यावर खर्च केल्याचं मान्य केले आहे. तपासादरम्यान, त्याच्या अनेक विमान प्रवासाची माहितीही समोर आली आहे. त्याने अनेक कॉल गर्ल्स आणि गर्लफ्रेंडना पैसेही ट्रान्सफर केले आहेत. अतिरिक्त डीसीपी अभिनय विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घोटाळा आणखी वाढू शकतो. तसेच यात आणखी अनेक आरोपी सामील असण्याची भीती पोलिसांना आहे.