नवी दिल्लीः काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व अपात्र ठरवले. त्यामुळं आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना निवडणुक लढवता येणार नाहीये. राहुल गांधी यांचे वय आता ५२ आहे. जर ते दोषी ठरले तर त्यांना आणखी सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळं आता त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी २०३४पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मोदी अडनावाच्या बदनामीप्रकरणी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्याआधारे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार २४ तासांच्या आत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. लोकप्रतिनिधी कायदा १९५१नुसार केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी हे त्यांच्या दोषसिद्धीच्या तारखेपासून म्हणजे २३ मार्च २०२३पासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले आहे., असं लोकसभा सचिवालयाने आपल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: घरांच्या किंमती वाढणार; या निर्णयाचा होणार परिणाम
राहुल गांधी यांच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास कायद्यानुसार राहुल गांधी यांना पुढील आठ वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. जर राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्यान न्यायालयाने नकार दिल्यास त्यांना २०२४ची लोकसभा निवडणुक लढवता येणार नाही. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जाऊ शकते, अशा प्रकारे एकूण आठ वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाही. राहुल गांधी थेट २०३४ची लोकसभा निवडणुक लढवू शकणार आहेत.

राहुल गांधी यांना तरुण नेता म्हणून ओळखले जाते. पण जर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही तर ते जेव्हा ६३ वर्षांचे होतील तेव्हाच निवडणूक लढवू शकतील. जर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर मध्यावधी निवडणुका लागल्या तरच राहुल गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळू शकते.

गांधी भक्तांनो मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नका; सावरकरांना हिणवल्याने ‘सामना’तून काँग्रेस नेत्यांना झापलं
दरम्यान, राहुल गांधी यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, उच्च न्यायालयात अपील करण्याचा कालावधी देण्यासाठी शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली.

ईडीवर आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची वेळ; गोपनीय दस्तावेज मूलचंदानीच्या माणसाला पुरवले, ३ अटकेत
काय आहे प्रकरण?

सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी कर्नाटकमध्ये झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केले होते. ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्या आडनावांमध्ये समान धागा काय आहे? सगळ्या चोरांचे आडनाव हे मोदी का असते,’ असे विधान त्यांनी केले होते. या वाक्यावरून भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here