राज्यात वाढत असलेल्या लव्ह जिहाद विरोधात विधिमंडळात आवाज उठवला जात आहे. विविध जिल्ह्यात हिंदुत्ववाद्यांचे मोर्चे निघत आहेत. लव्ह जिहादपासून मुलींना वाचवण्यासाठी आणि ते कशाप्रकारे मुलींना अडकवतात याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. लव्ह जिहाद विरोधात कायदा आला तर तो कसा वापरायचा हेही लोकांना कळायला हवं, यासाठी मी व्याख्यानमाला घेत असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
तसेच काही जिहाद्यांकडून हिंदू समाजाची लोकसंख्या कशी कमी होते याचे प्रयत्न होत असतात. याबाबत मी भाषणात केलेले वक्तव्य हे सत्याच्या आधारावर केले आहे. राज्यात जे काही मुस्लिम समाजाचे लँड पाडले गेले, हे जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप इमित्याज जलील यांनी केला होता, मात्र, इम्तियाज जलील याला स्क्रिप्टेड किंवा राजकीय रंग देऊन राज्यात लँड जिहाद जे सुरू आहेत त्याला झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राणे यांनी केला.
राहुल गांधींची खासदारकी रद्द; दिल्लीत मुख्यालयाबाहेर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
राज्यात जिथे जिथे हिंदू समाज राहतो तिथे तिथे जागा घ्यायच्या आणि तिथं डुक्कर कापायला सुरू करायचं जेणेकरून हिंदू समाज तेथून निघून जाईल आणि नंतर यांची लोकसंख्या तिथे वाढवायच असा षडयंत्र याचा सुरू आहे. मात्र स्क्रिप्ट कुठलंही असलं तरी लव्ह जिहाद आणि लँड जिहाद थांबलं पाहिजे हाच आमचा उद्देश आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले.संभाजीनगरचे नामांतर झाल्यानंतर अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. हे सर्व काम काही जिहादींकडून केले जाते. नुपूर शर्मा प्रकरणावेळी ही बाब समोर आली आहे. काही जिहाद्यांकडून हे मुद्दाम करण्यात येत आहे. केवळ हिंदू समाजाला कसे टार्गेट करायचा याचा प्रयत्न केला जात असून यासाठी काही पोलिस अधिकारी देखील त्यांच्यासोबत सामील आहेत. मात्र, आमची त्यांच्यावर नजर असल्याचेही आमदार नितेश राणेनी यांनी म्हटले.