छत्रपती संभाजीनगर : बीआरएस पक्षात प्रवेश केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्याला शिवसेनेत घेण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. तर पक्षाने आदेश दिल्यास कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जालना लोकसभा निवडणूक लढवीन, अशीही माहिती त्यांनी दिली. त्यामुळे येत्या काळात दानवे आणि जाधव यांच्यात लोकसभा निवडणुकीवरुन पुन्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी बीआरएस पक्षात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच काल शुक्रवारी शासकीय सुभेधारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. मी शिवसेनेत प्रवेश करणार होतो, मात्र मला नाकारलं गेल्याचं सांगत उद्धव ठाकरेंचं चिन्ह ज्या दिवशी काढून घेतलं, त्या दिवशी मी खूप भावुक झालो होतो, मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला होता. भाजपला ठोकायचं म्हणून खैरेंना सपोर्ट दर्शवला होता. मी कन्नडच्या आमदारांना देखील सर्पोट करायला तयार झालो होतो. मी ही भूमिका उद्धव ठाकरेंकडे पोहोचवली तर ‘नॉट इंटरेस्टेड’ असं उत्तर आल्याचं सांगत हर्षवर्धन जाधवांनी माजी मंत्री बबनराव घोलप आणि त्यांच्यातील कॉल‌ रेकॉर्डिंग ऐकवली.

पुढे बोलताना त्यांना कन्नड विधानसभा व जालना लोकसभा लढवण्याबाबत पत्रकारांनी अनेक वेळा प्रश्न विचारला असता त्यांनी बगल दिली. थेट उत्तर न देता प्रश्न टाळण्याचा प्रयत्न ते करत होते. मात्र काही वेळाने स्वतः हर्षवर्धन जाधव यांनी आता मी तुम्हाला हवं असलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो, असं म्हणत ‘मला पक्षाने जालना लोकसभेतून उमेदवारी दिली तर मी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवीन. कन्नड मतदारसंघातून संजना जाधव (दानवे) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवीन, असे स्पष्ट केले. यामुळे येत्या काळात दानवे आणि जाधव असा राजकीय संघर्ष लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकेल.

तुम्ही इतके महाविकासपुरुष होतात, तर लोकसभा निवडणुकीला का पडलात; शिवेंद्रसिंहराजेंची उदयनराजेंवर बोचरी टीका

मला नामकरणाच्या मुद्यात रस नाही, शहरवासियांना पाणी द्या

सध्या छत्रपती संभाजीनगर नामकारणावरून समर्थन-विरोध होत आहे. हा नवीनच आक्षेप नोंदविण्याची फॅशन आहे. कशाला आक्षेप पाहिजे. केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता असल्यावर करून टाका एकदाचं काय ते. बॉम्बेचे मुंबई झाले तेव्हा कुठे असं झालं. या मुद्यात आम्हाला रस नाही. शहरातील जनतेला अगोदर पाणी द्या. असे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले.

मोदी-अदानींचा २० हजार कोटींचा घोटाळा दडपण्यासाठी भाजपने माझी खासदारकी रद्द केली; राहुल गांधींचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here