grant road stabbing: दक्षिण मुंबईतील एका इमारतीत गेल्या आठवड्यात रक्तरंजित थरार घडला. ५४ वर्षांच्या चेतन भटनं शेजाऱ्यांवर चाकूनं हल्ला चढवला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

 

grant road stabbing
मुंबई: एका व्यक्तीनं त्याच्या शेजाऱ्यांवर चाकूनं हल्ला केल्याची घटना गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील ग्रँटरोडमधील चाळीत घडली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन दोन जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना रागाच्या भरात घडली असावी असा प्राथमिक अंदाज होता. मात्र हा पूर्वनियोजित होता. हल्ला करण्यासाठी वापरलेला रामपुरी चाकू चेतन गालानं चोर बाजारातून आधीच आणला होता, या गोष्टी तपासातून स्पष्ट झाल्या आहेत. ग्रँटरोडमधील पार्वती मॅन्शन या जुन्या इमारतीत राहणाऱ्या ५४ वर्षीय चेतन गालानं शुक्रवारी (२४ मार्च) त्याच्या शेजाऱ्यांवर चाकूनं सपासप वार केले. दुपारी साडे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. जवळपास अर्धा तास इमारतीत रक्तरंजित थरार सुरू होता. चेतनची पत्नी आणि तीन मुलं त्याच्यापासून वेगळी राहत होती. शेजाऱ्यांनी भडकवल्यामुळेच पत्नी सोडून गेली, असं चेतनला वाटत होतं. त्यामुळे शेजाऱ्यांबद्दल त्याच्या मनात राग होता. शुक्रवारी दुपारी चेतनची पत्नी त्याला जेवणाचा डबा देण्यासाठी आली होती. त्यावेळी सोबत मुलगीदेखील होती. चेतनचा पत्नीसोबत वाद झाला. त्यानं चाकू काढला आणि मुलीवर धावून गेला. पत्नीनं चेतनला ढकललं आणि मुलीला घेऊन तिथून पळ काढला.
चेतनला ‘त्या’ दोघींना संपवायचं होतं, चाकू घेऊन अंगावर गेला, पण…; ग्रँटरोडमध्ये काय घडलं?
संतापलेला चेतन घरातून बाहेर पडला. तो पत्नी आणि लेकीला शोधत होता. रागाचा पारा चढलेला चेतन शेजारच्या घरात शिरला. त्यानं इलाबाई मेस्त्री (७०) आणि जयेंद्र मेस्त्री (७७) यांची चाकूनं भोसकून हत्या केली. मेस्त्री कुटुंबाचा आक्रोश ऐकून पहिल्या मजल्यावरील स्नेहल ब्रह्मभट आणि त्यांची मुलगी जेनिल यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. चेतननं ब्रह्मभट मायलेकींवरही चाकूनं वार केले. जुन्या इमारतीच्या वऱ्हांडात हा संपूर्ण थरार सुरू होता. खाली बघ्यांची गर्दी जमली होती.
कुटुंबानं चाकू पाहिला, चेतनला फेकायला लावला, तरीही हल्ला झाला; ग्रँटरोडच्या चाळीत काय घडलं?
चेतन गालाकडे रामपुरी चाकू होता. त्यानं हल्ल्याची योजना आधीपासूनच आखलेली होती, असं पार्वती मॅन्शनच्या एका रहिवाशानं सांगितलं. मिड डेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ‘पत्नी अरुणा, दोन मुली आणि मुलं घरी न परतल्यास मी कोणाचा तरी खून करेन, अशी धमकी १५ दिवसांपूर्वीच चेतननं दिली होती. मात्र त्याकडे कोणीच गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. पत्नी आणि मुलं दूर गेल्याचा राग तो शेजाऱ्यांवर काढेल असा विचारदेखील आम्ही केला नव्हता,’ अशी माहिती रहिवाशानं दिली.

सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?

पार्वती मॅन्शनमधील रहिवाशी शुक्रवारी घडलेल्या प्रकारातून अद्याप बाहेर पडलेले नाहीत. ‘चेतनचे पत्नीसोबत वाद बऱ्याच महिन्यांपासून सुरू होते. चार महिन्यांपूर्वी चेतनला त्याचं कुटुंब सोडून गेलं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, अशी चर्चा रहिवाशांमध्ये सुरू आहे. पत्नी, मुलं चेतनपासून दूर राहत असली तरीही ती चेतनसाठी दररोज जेवणाचा डबा आणायची. त्यामुळे त्यांच्यातला वाद फार गंभीर नसावा. मग असं असताना चेतननं शेजाऱ्यांवर हल्ला का केला, निष्पाप शेजाऱ्यांची हत्या का केली,’ असे प्रश्न रहिवाशांना पडले आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here