grant road stabbing: दक्षिण मुंबईतील एका इमारतीत गेल्या आठवड्यात रक्तरंजित थरार घडला. ५४ वर्षांच्या चेतन भटनं शेजाऱ्यांवर चाकूनं हल्ला चढवला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

संतापलेला चेतन घरातून बाहेर पडला. तो पत्नी आणि लेकीला शोधत होता. रागाचा पारा चढलेला चेतन शेजारच्या घरात शिरला. त्यानं इलाबाई मेस्त्री (७०) आणि जयेंद्र मेस्त्री (७७) यांची चाकूनं भोसकून हत्या केली. मेस्त्री कुटुंबाचा आक्रोश ऐकून पहिल्या मजल्यावरील स्नेहल ब्रह्मभट आणि त्यांची मुलगी जेनिल यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. चेतननं ब्रह्मभट मायलेकींवरही चाकूनं वार केले. जुन्या इमारतीच्या वऱ्हांडात हा संपूर्ण थरार सुरू होता. खाली बघ्यांची गर्दी जमली होती.
चेतन गालाकडे रामपुरी चाकू होता. त्यानं हल्ल्याची योजना आधीपासूनच आखलेली होती, असं पार्वती मॅन्शनच्या एका रहिवाशानं सांगितलं. मिड डेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. ‘पत्नी अरुणा, दोन मुली आणि मुलं घरी न परतल्यास मी कोणाचा तरी खून करेन, अशी धमकी १५ दिवसांपूर्वीच चेतननं दिली होती. मात्र त्याकडे कोणीच गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. पत्नी आणि मुलं दूर गेल्याचा राग तो शेजाऱ्यांवर काढेल असा विचारदेखील आम्ही केला नव्हता,’ अशी माहिती रहिवाशानं दिली.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय? सेक्सटॉर्शनला बळी पडला असाल तर काय कराल?
पार्वती मॅन्शनमधील रहिवाशी शुक्रवारी घडलेल्या प्रकारातून अद्याप बाहेर पडलेले नाहीत. ‘चेतनचे पत्नीसोबत वाद बऱ्याच महिन्यांपासून सुरू होते. चार महिन्यांपूर्वी चेतनला त्याचं कुटुंब सोडून गेलं. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, अशी चर्चा रहिवाशांमध्ये सुरू आहे. पत्नी, मुलं चेतनपासून दूर राहत असली तरीही ती चेतनसाठी दररोज जेवणाचा डबा आणायची. त्यामुळे त्यांच्यातला वाद फार गंभीर नसावा. मग असं असताना चेतननं शेजाऱ्यांवर हल्ला का केला, निष्पाप शेजाऱ्यांची हत्या का केली,’ असे प्रश्न रहिवाशांना पडले आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.