मुंबई: पन्नाशीतील व्यक्तीनं शेजाऱ्यांवर जीवघेणा चाकू हल्ल्यानं मुंबई हादरली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (२४ मार्च) ही घटना घडली. आरोपी चेतन गालानं केलेल्या चाकू हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चेतनची पत्नी दीड महिन्यांपूर्वी त्याला सोडून शेजारच्या इमारतीत राहू लागली. शेजारच्यांनी भडकावल्यामुळेच आपली पत्नी, मुलं सोडून गेल्याचा चेतनचा समज होता. त्यामुळे शेजाऱ्यांबद्दल त्याच्या मनात राग होता. हाच राग उफाळून आल्यानं हत्याकांड घडलं.चेतन गाला सेक्स ऍडिक्ट असल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितल्याची माहिती मिड डेनं पोलिसी सुत्रांच्या दिली आहे. ‘चेतन सेक्स ऍडिक्ट आहे. २ वर्षांपूर्वी त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो काम करत नव्हता. त्यामुळे हाताशी पैसे नव्हते. त्यावरून घरात सतत वाद व्हायचे. याच वादाला कंटाळून पत्नी आणि मुलं चेतनपासून वेगळी राहू लागली. यासाठी चेतननं त्याच्या शेजाऱ्यांना जबाबदार धरलं आणि बदला घेण्याचा प्लान आखला,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
चेतनला ‘त्या’ दोघींना संपवायचं होतं, चाकू घेऊन अंगावर गेला, पण…; ग्रँटरोडमध्ये काय घडलं?
चेतन, त्याची पत्नी आणि मुलं ग्रँटरोडमधील पार्वती मॅन्शनमध्ये राहायची. वन रुम किचन असल्यानं घरात प्रायव्हसी नव्हती. त्यामुळे चेतन अनेकदा मुलांना बाहेर जाण्यास भाग पाडायचा. त्यासाठी जबरदस्ती करायचा. पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवता यावेत यासाठी त्याचे सतत प्रयत्न सुरू असायचे. पती-पत्नीच्या वादामागे हेच प्रमुख कारण होतं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कुटुंबानं चाकू पाहिला, चेतनला फेकायला लावला, तरीही हल्ला झाला; ग्रँटरोडच्या चाळीत काय घडलं?
गाला दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. यातील एका मुलीचं लग्न झालं आहे. ग्रँट रोडमध्ये चेतन गाला आणि त्याच्या भावाच्या मालकीचं एक दुकान आहे. ते त्यांनी भाड्यानं दिलं आहे. यातून महिन्याकाठी २० हजार रुपये मिळायचे. दोन भाऊ ते पैसे वाटून घ्यायचे. यातील काही रक्कम गाला स्वखर्चासाठी ठेवायचा. यामुळेही पत्नी आणि मुलांचे चेतनसोबत वाद व्हायचे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

चेतनसोबतच्या सततच्या वादांना कंटाळून पत्नी आणि मुलांनी शेजारीच असलेल्या पन्नालाल टेरेसमधील फ्लॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा फ्लॅट गाला यांच्या पालकांचा आहे. पत्नी घर सोडून गेल्यानंतर चेतन यांच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यानं पत्नीला अनेकदा घऱी परत बोलावलं. पण तिनं नकार दिला. माझ्यासोबत दिवसातला काही वेळ तरी घालव, अशी विनंती त्यानं करून पाहिली. ही विनंती पत्नीनं धुडकावली. शेजाऱ्यांनी फूस लावल्यामुळेच पत्नी आपल्यासोबत राहत नाही, असा त्याचा ठाम समज होता. शेजाऱ्यांवरचा हाच राग उफाळून आला आणि चाकू हल्ला प्रकरण घडलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here