यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही वर्षांत ऑनलाईन व्यवहारांचं प्रमाण अनेक पटींनी वाढलं आहे. त्यामुळे सायबर चोरटे लोकांना गंडवण्यासाठी नवेनवे मार्ग शोधून काढत आहेत.

गलती से मिस्टेक! चुना लावण्याची नवी पद्धत
सायबर चोरटे आधी यूपीआयच्या माध्यमातून लोकांच्या खात्यात काही पैसे पाठवतात. यानंतर संबंधित यूपीआय वापरकर्त्यांना फोन करतात. तुमच्या खात्यात चुकून पैसे आलेत. ते परत करा, अशी विनंती कॉलवर करतात. यानंतर यूपीआय वापरकर्त्यानं पैसे परत केल्सास त्याच्या बँक खात्याचे सारे तपशील, केवायसीशी संबंधित माहिती, आधार, पॅन कार्डचा तपशील चोरट्यांच्या हाती लागतो. यासाठी चोरटे एका मालवेअरचा वापर करतात. याच माहितीचा वापर करून चोरटे बँक खातं हॅक करू शकतात.
जाणकार काय सांगतात?
सायबर गुन्हे तज्ज्ञ पवन दुग्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण प्रक्रिया मालवेयर फिशिंग आणि मानवी अभियांत्रिकीचं मिश्रण आहे. यामुळे कार्यरत असणारं अँटी मालव्हेअर यंत्रणा किंवा सॉफ्टवेअर अशा प्रकारची फसवणूक पकडू शकत नाही. सध्याच्या व्यवस्था या प्रकारचे गुन्हे रोखण्यात कमी पडतात. त्यामुळे सायबर फ्रॉड करणाऱ्यांचा फोन आल्यास त्याला व्यवस्थित उत्तरं देणं आपल्या हातात आहे. कोणत्याही अज्ञात नंबरवरून फोन आल्यास, त्यानं पैसे परत करण्याची विनंती केल्यास, मी माझ्या बँकेला याबद्दल सांगितलं आहे, असं उत्तर तु्म्ही देऊ शकता. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला यूपीआयच्या माध्यमातून पैसे पाठवून त्याचा स्क्रिनशॉट पाठवणं टाळा.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.