अभिनेता याची आत्महत्या व त्यानंतरच्या चौकशीचा संबंध यांनी थेट मुंबईतील सुरक्षितेतशी जोडला होता. ‘सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीनं केला जात आहे, हे पाहता मुंबईनं माणुसकी गमावल्यासारखं वाटतंय. निष्पाप व स्वाभिमानानं जगणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित राहिली नसल्याचं अमृता यांनी सोमवारी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्यांनी एक प्रकारे मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त केला होता. त्याच्या या वक्तव्यामुळं अमृता फडणवीस टीकेच्या रडारवर आल्या आहेत.
याच अनुषंगानं पत्रकारांशी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी फडणवीसांना थेट राज्य सोडण्याचा सल्ला दिला आहे. ‘गेली पाच वर्षे राज्यात फडणवीस सरकार होतं. पोलीसही तेच होते. सरकार बदललं म्हणून पोलीस बदलत नाहीत. ज्या पोलिसांच्या सुरक्षेत गेली पाच वर्षे अमृता फडणवीस होत्या आणि आजही आहेत, त्या पोलिसांवरच त्यांचा अविश्वास असेल तर त्यांनी खुशाल हे राज्य सोडून जावं,’ असं संताप परब यांनी व्यक्त केला आहे.
‘फडणवीस सरकारनं मागील पाच वर्षे सतत पोलिसांची स्तुती केली. पोलिसांना शाबासकी दिली. त्याच्या मागे ठामपणे उभे राहिले. केवळ खुर्ची गेली म्हणून त्यांना असुरक्षित वाटत असेल तर राज्य सोडणं हाच एक उपाय असू शकतो. मुंबईतील कुठल्या नागरिकानं असुरक्षित वाटत असल्याची तक्रार केलीय? फडणवीसांना मुंबईत असुरक्षित वाटण्यासारखं असं काय घडलंय?,’ असा सवालही परब यांनी केला. ‘यात सरळ सरळ राजकारण आहे. दुसरं काय आहे? खुर्ची गेल्याची तडफड यातून दिसतेय. मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत याचं प्रकरण व्यवस्थित हाताळत आहेत,’ असंही परब यांनी स्पष्ट केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
A big thank you for your article.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.