रायपूर : झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. समाजातील काही लोकांनी दोन अनुसूचित जातीतील तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची करण्यात आलीय. मारहाण करणाऱ्यांनी आपल्याला , असा आरोपही पीडितांकडून करण्यात आलाय. गिरिडीह जिल्ह्यातील घघरडीहा गावात ही घटना उघडकीस आलीय. या दोन तरुणांवर करत यादव समाजातील व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तरुणांना मारहाण प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केलीय.

परमानंद कुमार दास आणि शंकर कुमार दास असं या दोन पीडित तरुणांची नावं आहेत. दुसऱ्या बाजुला यादव समाजातील विरोधी पक्षानंही या दोन तरुणांवर आपल्या बकऱ्याला मारल्याची तक्रार पोलिसांत दाखल केलीय.

वाचा :

वाचा :

यादव समाजातील एका व्यक्तीचा बकरा पीडित तरुणांच्या शेतात घुसला असताना त्यांनी त्याला हाकलून लावलं. दुसऱ्या दिवशी २९ जुलै रोजी आपल्या बकऱ्याला ठार मारल्याचा आरोप करत यादव समाजातील व्यक्तींनी पीडित तरुणांना घराच्या बाहेर काढत एका झाडाला बांधलं. गावचे सरपंच बालेश्वर यादव यांच्या उपस्थितीत पंचायतीत या दोन तरुणांना बकऱ्याला मारल्याची कबुली दिली. पंचायतीनं त्यांच्यावर ६० हजार रुपयांचा दंडही लावला.

वाचा :

वाचा :

परंतु, बकऱ्याला यादव पक्षाच्या लोकांनीच मारलं आणि आपल्याला जबरदस्तीनं हे कबूल करायला लावलं, असं पीडित तरुणांचं म्हणणं आहे. मारहाण करणाऱ्यांनी आपल्याला थुंकी चाटायला लावली, असा आरोप पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय. दुसरीकडे, पंचायत सुरू असताना गर्दी जमा झाली आणि काही जणांनी दोन्ही तरुणांना झाडाला बांधलं. परंतु, नंतर त्यांना सोडण्यात आलं. त्यांच्यासोबत इतर अत्याचार झालेच नसल्याचा दावा बालेश्वर यादव यांनी केला.

पोलिसांनी दोन्ही बाजूची तक्रार दाखल करून घेतलीय. परस्पर विरोधी वक्तव्यांची पडताळणी करत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here