Girish Bapat office: खासदार आणि भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्याच्या निधनाच्या २४ तासांच्या आतच त्यांचे शनिवार पेठेतील कार्यलाय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले.

गिरीश बापट हे स्वत: कार्यालयात बसून लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे. त्यांचे प्रश्न जागच्या जागी सोडवायचे. शनिवार पेठेतील कार्यलयात आलेला व्यक्ती हा कधीच रिकाम्या हाताने जात नसे ही बापटांची खासियत होती. इतकंच काय तर खासदार झाल्यापासून गिरीश बापट दिल्लीत असले तरी त्यांचे कार्यालय सुरू असायचे. त्यांच्या ऑफिसातील स्टाफ लोकांची गाऱ्हाणी ऐकून घ्यायचा आणि त्यावर मार्ग काढायचा. मोठ्या समस्या असतील तर बापटांना कळवल्या जायच्या आणि त्या सोडवल्या जायच्या.
गिरीश बापट अनंतात विलीन, पुणे शोकसागरात: ज्येष्ठ नेत्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर
गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. त्यांचं कार्यालयात येणं कमी झालं होतं. पण त्यांचं कार्यालय अविरत सुरु होतं. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जात होत्या. रुग्णालयातून तर कधी घरातून बापट आवश्यक त्या सूचना द्यायचे. त्यामुळेच काल बापट यांच्या निधनानंतरही त्यांचं कार्यालय सुरू ठेवण्यात आलं. जनसेवा हे बापट यांचं व्रत होतं. तेच सुरू ठेवण्याचं काम गिरीश बापट कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.