नवी दिल्ली : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र आणि कार्य संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी तसेच नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी नवी दिल्ली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ उभे करावे अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे दिल्ली येथे केली. या भेटीत राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखणारा कायदा आणावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे अशीही मागणी केल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी केली.

‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक’ हे राज्यशास्त्र, प्रशासन, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रातील संशोधक आणि अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरू शकेल, असं उदयनराजे भोसले म्हणाले. महाराजांच्या इतिहासात सुसुत्रता आणण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण आणि पुराभिलेखागार विभाग यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अप्रकाशित दस्तऐवज, पेंटिग्ज, शस्त्रास्त्रे तसेच अन्य कागदपत्रांचे संकलन, संशोधन आणि संपादन करणे आवश्यक आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्वाची ऐतिहासिक कागदपत्रे, वस्तू, चित्रे परदेशातील विविध संग्रहालयातून भारतात आणण्यासाठी राष्ट्रीय स्मारक फार गरजेचे आहे, असं उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले.

ऑटोतून कामासाठी निघालेले,नांदेडमध्ये ट्रकची धडक, अपघातात ५ जणांचा मृत्यू, ७ महिन्यांच्या बालिकेनं जीव गमावला

वेळ, वार ठिकाण ठरवा; मी भ्रष्टाचार केला असेल तर मिशाच काय भुवयाही काढून टाकेन; उदयनराजेंचं मोठं विधान

महाराजांचा इतिहास जगासमोर येण्याची गरज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या धोरणाला काही कुटील प्रवृत्ती सुरूंग लावताना दिसत आहेत. त्यातून वादंग उठत असून महाराजांचा सातत्याने अवमान होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचा अधिकृत इतिहास जगासमोर येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने व्यापक समिती नेमून खरा इतिहास नव्याने मांडला पाहिजे. हा इतिहास खंड रूपात तसेच विविध भाषांमध्ये प्रकाशित करावा. हे काम गुणवत्तेच्या आधारावर झाले तर इतिहासाची मोडतोड करण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल. तसेच सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगरात राडा, खा. इम्तियाज जलील मात्र राम मंदिर वाचवण्यासाठी धावले

राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा कोणी अवमान करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी आगामी अधिवेशनात राष्ट्रपुरूषांचा अवमान रोखण्यासाठी नवीन कायदा मंजूर करावा अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्याकडे केली. त्याबाबत कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करू असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. तसेच या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकर भेटीचे आश्वासन शाह यांनी यावेळी दिल्याची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली.

जनसामान्यांच्या सेवेचा वसा… बापटांचं शनिवार पेठेतील कार्यालय निधनाच्या अवघ्या २४ तासांच्या आत सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here