मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खूषखबर आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनिवार्य असलेला क्वारंटाइनचा कालावधी चाकरमान्यांसाठी ४ दिवसांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळं गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांना आता फक्त १० दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे.

करोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची कोंडी अखेर फुटली आहे. राज्य सरकारनं आज एकाच वेळी तीन मोठे निर्णय घेऊन कोकणी माणसांना गणपतीची भेट दिली. सरकारनं कोकणात जाण्यासाठी एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, त्यासाठी ई पासची अटही काढून टाकली आहे. या सगळ्याबरोबरच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, क्वारंटाइनचा कालावधी १० दिवसांचा केला आहे. १२ ऑगस्टच्या आधी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा नवा नियम लागू असणार आहे. १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांसाठी मात्र स्वॅब टेस्ट बंधनकारक असणार आहे.

वाचा:

करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आयसीएमआरच्या निर्णयानुसार, स्थलांतरितांना नव्या ठिकाणी किमान १४ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. मात्र, रेल्वे व एसटी बंद असल्यामुळं वेळीच गावी जाऊ न शकलेल्या कोकणातील गणेशभक्तांची यामुळं मोठी अडचण झाली होती. ही अडचण राज्य सरकारनं दूर केली आहे. गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता आपल्या घरी किंवा स्थानिक समितीच्या निर्देशानुसार विशिष्ट ठिकाणी फक्त १० दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. त्यामुळं चाकरमान्यांना गणपतीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here