नवी दिल्लीः देशात करोनाचा कहर सुरूच आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशातील करोना रुग्णसंख्या ही १७ लाखांवर गेलीय. सोमवारी तर देशात ५० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आलेत. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेची स्थिती आहे. पण दिल्ली, मुंबई आणि चेन्नईतून एक चांगली बातमीही आली आहे. या शहरांमध्ये नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर देशात दररोज लाखो नागरिकांची करोनाची होत आहे आणि तर रोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.

गेल्या २४ तासांत ६.६ लाखांहून अधिक चाचण्या केल्या गेल्या. यानुसार देशात आतापर्यंत एकूण २ कोटींहून अधिक नागरिकांच्या चाचण्या झाल्या आहेत. करोना रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. पहिल्या लॉकडाउनच्या तुलनेत मृत्यू दरही कमी झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

देशात सध्या ५, ८६, २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १२ लाखांहून अधिक नागरिक करोनामुक्त झाले आहेत. मृतांमध्ये ५० टक्के नागरिक हे ६० वर्ष आणि त्यावहून अधिक वयाचे आहेत. तर ३७ टक्के नागरिक हे ४५ ते ६० वयोगटातील आहेत. करोनाने देशात आतापर्यंत झालेल्या मृत्युंमध्ये ६८ टक्के पुरुषांचा समावेश आहे. तर ३२ टक्के महिला आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. करोनाने पुरुष आणि स्त्रीयांच्या मृत्युंमध्ये इतका फरक का आहे? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

राज्यांनी चाचण्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्यांत राज्यांनी वाढ केली आहे. २८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये लाखाच्या मागे रोज १४० हून अधिक चाचण्या होत आहेत. यापैकी गोवा, दिल्ली, त्रिपुरा आणि तामिळनाडूने चाचण्यांची क्षमता वाढवली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here