गेल्या २४ तासांत ६.६ लाखांहून अधिक चाचण्या केल्या गेल्या. यानुसार देशात आतापर्यंत एकूण २ कोटींहून अधिक नागरिकांच्या चाचण्या झाल्या आहेत. करोना रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. पहिल्या लॉकडाउनच्या तुलनेत मृत्यू दरही कमी झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशात सध्या ५, ८६, २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १२ लाखांहून अधिक नागरिक करोनामुक्त झाले आहेत. मृतांमध्ये ५० टक्के नागरिक हे ६० वर्ष आणि त्यावहून अधिक वयाचे आहेत. तर ३७ टक्के नागरिक हे ४५ ते ६० वयोगटातील आहेत. करोनाने देशात आतापर्यंत झालेल्या मृत्युंमध्ये ६८ टक्के पुरुषांचा समावेश आहे. तर ३२ टक्के महिला आहेत, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. करोनाने पुरुष आणि स्त्रीयांच्या मृत्युंमध्ये इतका फरक का आहे? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
राज्यांनी चाचण्यांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजन चाचण्यांत राज्यांनी वाढ केली आहे. २८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये लाखाच्या मागे रोज १४० हून अधिक चाचण्या होत आहेत. यापैकी गोवा, दिल्ली, त्रिपुरा आणि तामिळनाडूने चाचण्यांची क्षमता वाढवली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
Thanks so much for the blog post.
Thank you ever so for you article post.
Like!! Thank you for publishing this awesome article.