‘काँग्रेसचे नेतेही राम मंदिराचे समर्थक’
गोविंदाचार्य हे सन १९८८-९१ मध्ये भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांचे विशेष सहायक होते. आडवाणी यांनी सन १९९० मध्ये काढलेल्या रथयात्रेचे ते एक मुख्य योजनाकार होते. या रथयात्रेमुळे आंदोलनाला गती प्राप्त झाली. त्यानंतर भगवा पक्ष भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. दिग्विजय सिंह आणि कमलनाथ यांच्यासारखे काँग्रेसचे नेते आता राम मंदिराच्या समर्थनार्थ बोलत आहेत. याचा अर्थ राम मंदिराचा मुद्दा हा लोकांमध्ये वैचारिक आणि भावनात्मक महत्त्व काय आहे याचे आकलन आता या नेत्यांना होत असल्याचा हा संकेत असल्याचे गोविंदाचार्य म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाच्या विचारधारेप्रमाणे चालल्यामुळेच त्या बदल्यात लोकांनी त्यांना स्वीकारले आहे, असे गोविंदाचार्य म्हणाले. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे पतन झाले आहे, लोकांना या दोन नेत्यांना नाकारले आहे, असेही ते पुढे म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या यशाचे मोठे श्रेय हे विरोधी पक्षांना जात असल्याचे ते म्हणाले.
वाचा:
काँग्रेस पक्षाने आता महात्मा गांधीच्या आदर्शांकडे जायला हवे. इंदिरा गांधी यांना सन १९७७ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, त्यानंतर १९८० मध्ये त्या सत्तेत पुन्हा आल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाच्या भावनेप्रती त्यांना संवेदनशील झाल्या होत्या, असेही गोविंदाचार्य म्हणाले.
नक्की पाहा-
भविष्यकाळात देखील भारतीय राजकारणात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहील आणि हिंदुत्व ही विचारधारा मानणाऱ्या पक्षांमध्ये भविष्यात मोठी स्पर्धा निर्माण होईल, असेही गोविंदाचार्य म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
These are actually great ideas in concerning blogging.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.