जयपूर: राजस्थानात रामनवमी उत्सवादरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रामनवमीनिमित्त गुरुवारी कोटा येथे मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या तिघांचा करंट लागल्यानं मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन जण गंभीर झाले. सुलतानपूरमधील कोटडादीप गावात ही घटना घडली. आखाड्यातील तरुण त्यांची कला सादर करत असताना हा प्रकार घडला. एका तरुणाच्या हातातील चक्र वरून जाणाऱ्या हायपरटेंशन वायरवर अडकलं. त्यानंतर करंट पसरला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली. आनंदावर विरजण पडलं आणि परिसरावर शोककळा पसरली. शोभायात्रेत कला सादर करताना तरुणाचा हात ११ केव्ही हायटेंशन वायरला लागला. यानंतर करंट पसरला आणि तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोटा येथे हलवण्यात आलं. तिथे उपस्थित असलेल्यांनी काठी आणि पाणी टाकून तरुणांचा वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र विजेचा शॉक इतका जोरदार होता की अनेक जण जागीच बेशुद्ध पडले. यानंतर एकच गोंधळ उडाला.
लग्नानंतर ३ महिन्यांनी माहेरी गेलेल्या तरुणीनं आयुष्य संपवलं; विरहात पतीचं टोकाचं पाऊल
बेशुद्ध पडलेल्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांना तातडीनं सुलतानपूरमधील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी तिन्ही तरुणांना मृत घोषित केलं. ललित, अभिषेक आण महेंद्र अशी मृतांची नावं आहेत. जखमी असलेल्या हिमांशु, राधेश्याम आणि अमित यांना कोटा येथील एमबीएस रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. जिल्हाधिकारी ओ. पी. राजभर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कवेंद्र सागर यांनी कोटा येथील एमबीएस रुग्णालय गाठून जखमींची चौकशी केली. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करण्याचे आदेश दिले. या घटनेची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कार्यवाहीचे आदेश देण्यात येतील, असं पोलीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here