म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत पोटनियमाचे कारण पुढे करत २९ उमेदवारांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांच्या पात्रतेचे सव्वा लाखावर कागदपत्रे आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी प्रादेशिक साखर संचालकांकडे सादर केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत नियमित ऊस घातला नाही असे कारण सांगत आमदार पाटील गटाच्या २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी हा निर्णय घेतला होता. यामुळे पाटील व महाडिक गटातील संघर्ष वाढला आहे. महाडिक घाबरले म्ह्णून त्यांनी प्रशासनावर दबाव आणत हा निर्णय घ्यायला लावला असा आरोप पाटील यांनी केला होता. मागून लढण्यापेक्षा मैदानात येऊन लढा असे आव्हानही त्यांनी दिले. त्यानंतर महाडिक यांनीही त्यांना प्रतिआव्हान दिले होते.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार पाटील आपल्या समर्थकासह प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात आले. २९ उमेदवारांच्या पात्रतेचे पुरावेच त्यांनी सादर केले. दोन वाहनातून त्यांनी सव्वा लाख पुरावे आणले होते. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. तीन एप्रिलपर्यंत अपील करण्याची मुदत असल्याने त्यानंतर संबंधितांना नोटीसा काढून चौकशी करण्याचे आश्वासन साखर सहसंचालक अशोक गाढे यांनी सांगितले.

कारखान्याच्या या निवडणुकीत १२ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. प्रादेशिक सह संचालकांना दहा दिवसात आपला निर्णय द्यावा लागणार आहे. त्यांनी जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला, तर त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे. यामुळे या निवडणुकीत आता प्रादेशिक सहसंचालकांचा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

यापूर्वी त्यांनी अठराशेवर सभासद कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. त्यावरही पाटील यांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर सध्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराला जोर आला असताना प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या निर्णयाने चुरस वाढत चालली आहे.

मर्दासारखं लढा, बावड्याचा पाटील मागे हटणार नाही, माझ्याकडे एक्का, डाव आम्हीच जिंकणार, बंटी पाटलांनी ललकारलं
२९ उमेदवारांना अपात्र ठरवलं, सतेज पाटलांनी जोरदार भाषण ठोकलं

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत महाडिकांनी रडीचा डाव खेळलाय. त्यांनी जोकर टाकलाय, एक्का माझ्याकडे आहे. आता तुमची पाठ सोडत नसतो. तुमच्या सत्ताकाळात एवढा जर तुम्ही चांगला कारभार केला होता तर १२ हजार सदस्यांना का घाबरलात? कुस्ती करायची होती मग पळपुटेपणा का करता? जर तुमची एवढीच ताकद होती, एवढीच जर खुमखुमी होती तर मैदानातून पळ का काढलात?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत १४ तास राबणार होतो पण आता झोपणारच नाही, असा निर्धार करुन महाडिकांविरोधातील लढाई तीव्र केल्याची घोषणाच आमदार बंटी पाटलांनी केली.

मग्रुरी सहन करणार नाही, हा DY पाटील कारखाना वाटला काय? रणांगणात या, मग बघतो : अमल महाडिक
लोकांत जाऊन निवडणूक जिंकू शकत नाही हे कळाल्यामुळेच महाडिक यांच्याकडून रडीचा डाव खेळण्यात आला आहे. हिम्मत असेल तर समोरासमोर लढा, सभासदांना निर्णय घेऊ दे, कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखी लढा. आता तुम्ही रडीचा डाव खेळलाय. हा बावड्याचा पाटील कधीही मागे हटणार नाही. ज्या गावात जाईन, तिथेच वळकट घेऊन जाणार, सकाळी उठून प्रचाराला लागणार, असं आव्हानच सतेज पाटलांनी महाडिकांना दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here