बेरुतः लेबननची राजधानी असललेल्या बैरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भीषण स्फोट झाले. या घटनेत जवळपास २७ ठार तर २५०० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

हे स्फोट इतके भीषण होते की आजूबाजूच्या इमारती हादरल्या. यामुळे इमारतींमधील नागरिक भूकंप झाल्याच्या भीतीने बाहेर पडले. प्रत्येक जण आपल्या नातेवाईकांच्या तब्येतीची विचारपूस करत होते.

हे स्फोट पोर्ट भागात झाले. वर्षभारापूर्वी अतिसंवेदनशील स्फोटकं आणि साहित्य जप्त करण्यात आली होती. ही स्फोटकं एका ठिकाणी ठेवण्यात आली होती. त्यांचा स्फोट झाला असावा, अशी शक्यता लेबनानच्या गृहमंत्र्यांनी व्यक्त केलीय. तर कित्येक टन नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती सीमा शुल्क (customs) विभागाचे संचालकांनी दिली, असं लेबननाच्या माध्यमांकडून वृत्त देण्यात येतंय.

बैरुतमधील दुहेरी स्फोटांचा व्हिडिओ एका इमारतीच्या गॅलरीतून शूट करण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्फोटानंतर हवेत आगीचे लोळ उठले आणि त्यानंतर धुळ उडाली. हा व्हिडिओ शूट करणारेही स्फोटाच्या हादऱ्याने इमारतीच्या गॅलरीत पडले.

बैरुतमधील दुहेरी स्फोटांमध्ये आतापर्यंत १० मृतदेह आढळून आले आहेत, अशी माहिती सुरक्षा यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणांच्या सूत्रांनी दिल्याचं वृत्त रॉयटर्स या संस्थेनं दिलं आहे. तर शेकडो नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं लेबननच्या रेड क्रॉसने सांगितलंय.

स्फोटांच्या घटनेनंतर लेबनानचे अध्यक्ष मायकल आउन यांनी तातडीची सुरक्षा परिषदेची बैठक बोलावलीय. अध्यक्षांच्या ट्विटर हँलवरून ही माहिती देण्यात आलीय. तर पंतप्रधान हसन दियाब यांनी बुधवारी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळण्याची घोषणा केलीय.

भारतीय दुतावासाने जारी केला हेल्पलाइन क्रमांक

बेरुतमधील स्फोटानंतर लेबनानमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. दुतावासाने भारतीय नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कुठल्याही भारतीय नागरिकांना मदत हवी असल्यास त्यांनी संबंधित क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन दुतावासाकडून करण्यात आलं आहे.

दुतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. दुतावास सर्व भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे. स्फोटांमध्ये अद्याप कुठल्या भारतीय नागरिकाची हानी झाल्याचे वृत्त नाहीए. घटनेवर लक्ष ठेवण्यात येत असून भारतीय संस्था आणि विविध समाजांच्या संपर्कात आहोत. स्फोटामुळे बेरुतच्या मध्यभागी असलेल्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती लेबनानमधील भारताचे राजदूत एस एजाज खान यांनी दिल्याचं एएनआयने वृत्त दिलं आहे.

शिया हिजबुल्लाह या संघटनेकडून २००५ मध्ये स्फोट घडवण्यात आले होते. या घटनेत लेबनानचे पंतप्रधान रफिक अल हररी यांच्यासह २१ नागरिक ठार झाले होते. या घटनेच्या दोषींविरोधात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित कोर्टाकडून निकाल देण्यात येणार आहे. या निकालाच्या तीन दिवसांपूर्वी हा स्फोट झाला आहे. या स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here