‘पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केलेला पाकिस्तानचा तथाकथित ‘राजकीय नकाशा’ पाहिला. भारतातील गुजरात आणि केंद्र शासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागांवर हक्क सांगणे म्हणजे राजकीय मूर्खपणाचे एक उदाहरणच आहे. या प्रकाराला कायदेशीर वैधता नाही की कोणतीही आंतरराष्ट्रीय विश्वासार्हता नाही. वास्तविक, हा नवीन प्रयत्न सीमेपलिकडे दहशतवादाच्या माध्यमातून साम्राज्यवादी विस्ताराच्या पाकिस्तान विचारांची पुष्टी करतो, असं भारताने म्हटलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टीव्हीवर निवेदन दिले. हा नवीन नकाशा गेल्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी भारताने घेतलेल्या निर्णयाला खोटा ठरवणारा आहे. या नवीन नकाशाला त्यांच्या मंत्रिमंडळाचा आणि संपूर्ण राजकीय नेतृत्वाचा पाठिंबा आहे. आता पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तिकांमध्ये याचा उपयोग होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा निर्णय स्वीकारणं हाच काश्मीर वादावर तोडगा आहे. पाकिस्तान त्यासाठी राजकीय आणि मुत्सद्दी प्रयत्न करत राहील, असं इम्रान खान म्हणाले. या नवीन नकाशामधील काश्मीर, सियाचीन आणि सर क्रीकचा वादग्रस्त भाग हा पाकिस्तानचा असल्याचा दावा पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केला.
भारताने यावर प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही पाकिस्तानचा एक कथित “राजकीय नकाशा” पाहिला आहे जो पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केला आहे. गुजरातच्या सर क्रीक आणि जम्मू-काश्मीर-लडाखवरील दावे निराधार असून या दाव्यांकडे कायदेशीर वैधता किंवा आंतरराष्ट्रीय विश्वसनीयता नाही. खरं तर, हा नवीन प्रयत्न सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या पाकिस्तानच्या उत्कटेला दुजोरा देणारा आहे, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
Thanks so much for the blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.