भुवनेश्वर: क्रिकेटच्या मैदानात घडलेल्या संघर्षातून एकाचा जीव गेला आहे. किक्रेटचा सामना सुरू असताना पंचांनी नो बॉल दिला. त्यावरून वाद झाला. यानंतर तरुणानं पंचांची चाकू भोसकून हत्या केली. घटना कटक जिल्ह्यातील महिशिलांदा गावात घडली. गावात क्रिकेटचा सामना सुरू होता. त्या दरम्यानं पंचांनी नो बॉलचा इशारा केला. त्यावरून मैदानातच वादाला सुरूवात केली. आरोपीनं लकी राऊत (२२) या तरुणाची हत्या केली. लकी या सामन्यात पंच म्हणून काम पाहत होता. आरोपीला ग्रामस्थांनी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. महिशिलांदामध्ये क्रिकेटची स्पर्धा भरवण्यात आली होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर या दोन संघात सामना सुरू होता. सामना पाहायला शेकडो ग्रामस्थ जमले होते.
श्वास घेण्यास त्रास, १३ वर्षांची मुलगी अचानक कोसळली; कुटुंब रिक्षा आणायला धावलं, पण…
पंच असलेल्या लकीनं ब्रह्मपूर संघाविरोधात चुकीचा निर्णय दिला. त्यावरून आरोपी स्मृती रंजन नावाचा तरुण संतापला. त्यानं पंच लकीशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू वाद वाढू लागला. या दरम्यान स्मृती रंजननं भरमैदानात चाकू काढला आणि पंच लकीवर हल्ला सुरू केला. त्यानं लकीवर चाकूनं सपासप वार केले. या हल्ल्यात लकी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीनं एससीबी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.

समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?

डॉक्टरांनी लकीची तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. यानंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. सध्या पोलिसांनी गावात एक तुकडी तैनात केली आहे. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here