बारामती : बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महावितरण कर्मचाऱ्यासोबत एक शेतकरी विजेच्या खांबावर चढला असताना त्याला विजेचा धक्का लागला. यात या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. वीज कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला खांबावर चढायाला लावले. विजेचा प्रवाह सुरू असताना संबधित शेतकऱ्याचा हात विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला लागला आणि तो शेतकरी खाली कोसळला. या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. विजय मुरलीधर गवळी (वय ५५) असे विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.या घटनेनंतर शेतकऱ्यांचे नातेवाईक आक्रमक झाले असून त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तोपर्यंत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

Breaking अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, जामीन मिळणार की तुरुंगात जाणार?
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महावितरण कर्मचाऱ्यांनी गावातील शेतकरी असलेल्या विजय गवळी यांना खांबावर चढता येत असल्याने वीज दुरुस्तीसाठी खांबावर चढण्यास सांगितले. मात्र खांबावर चढल्यानंतर तारेतून विजेचा प्रवाह सुरू होता. त्या तारेला शेतकऱ्याचा हात लागला. आणि शेतकरी खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर त्याला संबधित कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर दोन्हीही कर्मचारी गायब झाले असून जोपर्यंत त्यांचेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान
‘अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार’

झालेली घटना दुर्दैवी आहे. ज्यावेळेस एखादा वीज अपघात होतो त्यावेळेस आम्ही विद्युत निरीक्षकाला माहिती देतो. त्यानंतर त्याचा अहवाल येतो. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विकास पुरी यांनी दिली.
तुुझे पैसे देत नाही जा; धमकी, शिवीगाळ करत आडत व्यापाऱ्यांनी कांदा व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here