काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरंतर, सिंहवाडा ठाणे परिसरात इफ्तिखार नावाच्या व्यक्तीचं कुटुंब होतं. आई आणि बायकोला गावी ठेवून कामानिमित्त इफ्तिखार हा मुंबईला असायचा. सासू-सूनांमध्ये रोज क्षुल्लक कारणावरून वाद होत होते. याची चुगली पत्नी रोज पतीला करायची. यामुळे दोघींमध्ये आणखी वाद चिघळला होता. अखेर इफ्तिखार हा रागात गावी परतला आणि त्याने कोणतीही विचारपूस न करता थेट आईची हत्या केली. तो गावी जाताच आईला शोध शेतात गेला आणि तिथे तिची चाकूने भोसकून हत्या केली.
इफ्तिखार याने इतक्या रागात आईला चाकू भोसकला की यामध्ये त्यांचा जागीच मृ्यू झाला. स्थानिकांनी घटना पाहताच जखमी आईला तातडीने रुग्णालयात नेलं पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
वडिलांनी सांगितलं धक्कादायक सत्य…
या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीच्या वडिलांनी इफ्तिखार याच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश केला. मुलगा रोज दारू पिऊन नशा करतो. तो मुंबईत मजूरी करून उदरनिर्वाह करतो. पण घरी एक रुपयाही पाठवत नाही. त्याच्या मुलांना आणि बायकोला मी एकटा म्हातारा सांभाळतो. पण तरी तो त्याच्या पत्नीच्या सांगण्याला भूलला आणि त्याने जन्मदात्या आईची हत्या केल्याची माहिती वडिलांनी दिली.
नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला