नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या आहेत. तब्बल २ लाख ७५ हजार विटांतील १०० विटांवर ‘जय श्रीराम’ असं कोरलेलं आहे. मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री , राज्यपाल आनंदीबेन पटेल हेदेखील पूजेसाठी उपस्थित होते. यातील नऊ विटा पूजेत सामील करण्यात आल्या. दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित करत आहेत.

– वर्षानुवर्षांची प्रतिक्षा आज संपुष्टात आली. संपूर्ण भारत आज भावूक आहे. वर्षानुवर्षाच्या घटनाक्रमातून राम जन्मभूमी आज मुक्त झाली

– मी इथं येणार होतोच कारण, ‘राम काज कीनु बिन मोहि कहां विश्राम’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

– ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’नं मला आमंत्रित केलं हे माझं भाग्य आहे. यासाठी मी हृदयापासून ट्रस्टचे आभार मानतो

वाचा : वाचा : वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here