नवी दिल्ली- सुशांतसिंह राजपूतशी निगडीत एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने बिहार सरकारच्या याचिकेवर मोहर लावत सुशांतची केस पाहील असा निर्णय घेतला. १४ जून रोजी सुशांतचा त्याच्या मुंबईतील राहत्या घरी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला २ महिने होणार आहे. मात्र अजूनही त्याच्या मृत्यूचं कारण कळालं नाही. यानंतर बिहार सरकारच्या सांगण्यावूरन केंद्राने आता या मृत्यूची चौकशी सीबीआय करेल असं निश्चित केलं आहे.

बिहार सरकारच्या याचिकेनंतर केंद्र सरकारने ही केस सीबीआयकडे दिली असल्याची माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जस्टिस एच रॉय यांना दिली. यासोबत रिया चक्रवर्तीनेही व्हावी अशी मागणी केली होती. तसेच सुशांतची केस पटणातून मुंबईत यावी या रियाच्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी सुरू आहे.

कुटुंबानेही केली होती सीबीआय चौकशीची मागणी

सुशांतच्या वडिलांनी यांनी रिया चक्रवर्तीविरोधात पटणा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. वडिलांनी रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप केला होता. बिहार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यसाठी त्यांची एक टीम मुंबईत पाठवली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे मुंबई पोलीस त्यांना सहकार्य करत नसल्याचं बिहार पोलिसांनी सांगितलं.

तसेच टीम लीड करण्यास गेलेल्या आयपीएस विनय तिवारी यांनाही मुंबईत क्वारन्टीन करण्यात आलं. यानंतरच आणि सुशांतच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीचा मुद्दा उचलून धरला. याआधीपासूनच सुशांतचे चाहते या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी याची मागणी करत होते. मुंबई पोलिसांचे तपासात असहकार्य पाहून सुशांतच्या कुटुंबियांनीही शेवटी सीबीआय चौकशीची मागणी केली.

रियाच्या वकिलांनी सांगितलं, दुसऱ्या राज्याच्या पोलिसांना नाही तपासाचा अधिकार-

मंगळवारी बिहार सरकारने सुशांतच्या वडिलांच्या मागणीवर केंद्र सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, राज्य सरकारने मंगळवारी सीबीआय चौकशीची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. या मागणीला आव्हान देत रियाचे वकील म्हणाले होते की, कोणत्याही राज्य सरकारला अशा प्रकारची शिफारस करण्याचा अधिकार नाही.

सुशांतचे वकील म्हणाले लगेच व्हावी सीबीआय चौकशी

सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनीही एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, बिहार पोलिसांच्या तपासात मुंबई पोलिसांकडून व्यत्यय आणला जात आहे. आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांनाही जबरदस्तीने क्वारन्टीन करण्यात आले. यामुळे आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी असं आम्हालाही वाटत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here