accident on mumbai goa highway, मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, बोरिवलीच्या तावडे कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा मृत्यू – accident on mumbai goa highway at kashene mangaon three died from borivali
Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघातांची मालिका सुरू असताना आता मुंबई-गोवा महामार्गावरील भीषण अपघाताचं वृत्त आलं आहे. या अपघातात मुंबईच्या बोरिवलीतील तिघांचा मृत्यू झाला आहे.
महाड, रायगड : मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचा समावेश आहे. रिवान दर्शन तावडे (वय वर्षे ३), रित्या दर्शन तावडे ( वय ६ महिने) आणि वैशाली विजय तावडे (वय वर्ष ७२) अशी मृतांची नाव आहे. आणि हे सर्व बोरीवलीचे राहणारे होते. तावडे कुटुंबीय आपल्या कारमधून बोरीवली येथून देवगडला कोकणात जात होते. यावेळी माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत हा दुर्दैवी अपघात झाला. दर्शन तावडे आणि श्वेता तावडे हे दोघे जखमी झाले आहेत. या अपघाताचा अधिक तपास माणगाव पोलीस करीत आहेत. मंत्री उदय सामंत, संभाजीराजेंची स्पीड बोट भरकटली; अलिबागच्या किनाऱ्यावर मोठा अनर्थ टाळला
महत्वाचे लेख
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.